अ‍ॅपशहर

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांमधला वाद चव्हाट्यावर, IPL पूर्वीच संघात ठिणगी

Rohit Sharma Controversy : मुंबई इंडियन्समध्ये नेमकं चा़ललंय तरी काय, हा प्रश्न आता चाहत्यांना पडायला लागला आहे. कारण आता आयपीएल सुरु पण झाले नाही पण त्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्यामध्ये जोरदार वाद सुरु झाला आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 31 Mar 2023, 10:59 am
मुंबई : रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्यातील वादाचा पहिला अंक बुधवारी पाहायला मिळाला होता. पण त्यानंतर आता रोहित आणि बाऊचर यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. कारण या वादातील दुसरा अंक आता समोर आला आहे. कारण रोहितच्या एका वक्तव्याचा चांगलाच समाचार आता बाऊचर यांनी घेतल्याचे आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम controversy in Mumbai Indians before ipl 2023


ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यावर रोहित शर्माने खेळाडूंना आयपीएलमध्ये विश्रांती देण्यात यावी,असे म्हटले होते. पण या गोष्टीचा खरपूस समाचार आता बाऊचर यांनी घेतला आहे. बाऊचर यांनी सांगितले की, 'टी-२० या क्रिकेटच्या सर्वांत लहान प्रकारात कार्यभाराचा मुद्दा असूच शकत नाही. हे चांगले आहे की खेळाडूंवरील ताणाची चर्चा होऊ लागली आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी याचे साधे नावही कुणी काढत नव्हते. तुम्ही या लीगचा कार्यक्रम पाहिलात तर दोन सामन्यांच्या मध्ये विश्रांती आणि निवांतपणाचे क्षण खेळाडूंना मिळणार आहेत. आयपीएलमध्ये कामाच्या भाराचा प्रश्न येणार नाही, असे मला तरी वाटते. तरीदेखील सहायक वर्गातील अधिकारी प्रत्येक खेळाडूच्या कामावर लक्ष ठेवून असतील. एखाद्याची दमछाक होतच असेल, तर विचार करू. पत्रकार आणि काही मंडळी कधीकधी या मुद्द्याचा उगीचच बाऊ करतात. टी-२०मध्ये कामाच्या भाराचा प्रश्नच उद्भवत नाही,' असे बाउचर म्हणाले.

या वर्षी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन होत असून, त्या दृष्टीने भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीगदरम्यान (आयपीएल) विश्रांती मागून घ्यावी, अशी सूचना भारताचा कर्णधार रोहित शर्माने अलीकडेच केली होती. मात्र, याच मुद्द्यावर रोहितच्याच मुंबई संघाचे प्रशिक्षक बाउचर यांचे विधान भुवया उंचावणारे ठरले. बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद झाली. त्यात रोहितच्या खांद्याला खांदा लावूनच बसलेल्या बाउचर यांनी कोणताही आडपडदा न ठेवता मुंबई संघाची भूमिका स्पष्ट केली. गेल्या वर्षी गुणतक्त्यात तळाच्या दहाव्या क्रमांकावर घसरलेल्या मुंबईने यंदा 'राखेतून आकार' घेण्य़ाचे ध्येय समोर ठेवले आहे. मुंबईची पहिली लढत २ एप्रिलला बेंगळुरूविरुद्ध होणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज