मुंबई : मुंबई इंडियन्सला आठव्या सामन्यातही पराभवच पत्करावा लागला. पण या पराभवाला जबाबदार आहे तरी कोण, याबाबतचं मौन आता कर्णधार रोहित शर्माने सोडलं आहे. सामना संपल्यावर रोहित शर्मा निराश झाला होता, त्यानंतर त्याने या पराभवासाठी नेमकं जबाबदार कोण आहे, तेदेखील सांगितलं आहे.
रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, पाहा...
सामना संपल्यावर रोहित म्हणाला की, " माझ्यामते गोलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. कारण वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी चांगली होती. पण त्याचा फायदा आमच्या फलंदाजांना उचलता आला नाही. लखनौने दिलेले १६९ धावांचे आव्हान आम्ही यशस्वीपणे पूर्ण करायला हवे होते. जेव्हा तुमच्या समोर अशी धावसंख्या गाठण्याचे आव्हान असते तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते ती भागीदारी. जर चांगल्या भागीदाऱ्या झाल्या तर तुम्ही सामने जिंकू शकता आणि हीच गोष्ट आमच्या संघाकडून झाली नाही. माझ्यासहीत फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळले आणि हीच गोष्ट पराभवासाठी कारणीभूत ठरली. लखनौच्या गोलंदाजांनीही यावेळी चांगली गोलंदाजी केली, खासकरून त्यांनी मधली षटकं चांगली टाकली. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये आम्ही चांगली फलंदाजी करू शकलेलो नाही. जर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर त्यासाठी एक तरी फलंदाज हा जास्त काळ खेळणे गरजेचे असते. जर एखादा फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर राहीला तर मोठी धावसंख्या गाठता येऊ शकते. पण हीच गोष्ट आमच्याकडून झालेली पाहायला मिळाली नाही. या एका गोष्टीमध्ये आम्ही सर्वच अपयशी ठरलो आहोत. प्रतिस्पर्धी संघातील काही खेळाडूंनी ते करून दाखवलं आणि त्यामुळेच आम्हाला धक्का बसला. संघाची निवड करताना टिम डेव्हिडच्या नावाचीही चर्चा झाली. या स्पर्धेसाठी संघ निवडताना प्रत्येक खेळाडूची चर्चा केली जाते. ज्या फलंदाजाला आम्ही संधी देतो, त्याने धावा करायला हव्यात एवढीच आमची इच्छा असते. त्यामुळेच आम्ही संघात जास्त मोठे बदल करत नाही. प्रत्येक खेळाडूला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी मिळायला हवी, असे माझे मत आहे."
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि लखनौला १६८ धावांपर्यत रोखले. पण मुंबई इंडियन्सच्या बेजबाबदार फटके मारले आणि ते बाद झाले. हीच गोष्ट मुंबईच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. रोहित शर्माने देखील सामान संपल्यावर पराभवाचे हेच कारण अधोरेखित केले आहे. त्यामुळे आता मुंबईला पुढचा सामना जिंकायचा असेल तर त्यांना फलंदाजीवर जास्त भर द्यायला लागणार आहे.
रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, पाहा...
सामना संपल्यावर रोहित म्हणाला की, " माझ्यामते गोलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. कारण वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी चांगली होती. पण त्याचा फायदा आमच्या फलंदाजांना उचलता आला नाही. लखनौने दिलेले १६९ धावांचे आव्हान आम्ही यशस्वीपणे पूर्ण करायला हवे होते. जेव्हा तुमच्या समोर अशी धावसंख्या गाठण्याचे आव्हान असते तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते ती भागीदारी. जर चांगल्या भागीदाऱ्या झाल्या तर तुम्ही सामने जिंकू शकता आणि हीच गोष्ट आमच्या संघाकडून झाली नाही. माझ्यासहीत फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळले आणि हीच गोष्ट पराभवासाठी कारणीभूत ठरली. लखनौच्या गोलंदाजांनीही यावेळी चांगली गोलंदाजी केली, खासकरून त्यांनी मधली षटकं चांगली टाकली. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये आम्ही चांगली फलंदाजी करू शकलेलो नाही. जर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर त्यासाठी एक तरी फलंदाज हा जास्त काळ खेळणे गरजेचे असते. जर एखादा फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर राहीला तर मोठी धावसंख्या गाठता येऊ शकते. पण हीच गोष्ट आमच्याकडून झालेली पाहायला मिळाली नाही. या एका गोष्टीमध्ये आम्ही सर्वच अपयशी ठरलो आहोत. प्रतिस्पर्धी संघातील काही खेळाडूंनी ते करून दाखवलं आणि त्यामुळेच आम्हाला धक्का बसला. संघाची निवड करताना टिम डेव्हिडच्या नावाचीही चर्चा झाली. या स्पर्धेसाठी संघ निवडताना प्रत्येक खेळाडूची चर्चा केली जाते. ज्या फलंदाजाला आम्ही संधी देतो, त्याने धावा करायला हव्यात एवढीच आमची इच्छा असते. त्यामुळेच आम्ही संघात जास्त मोठे बदल करत नाही. प्रत्येक खेळाडूला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी मिळायला हवी, असे माझे मत आहे."
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि लखनौला १६८ धावांपर्यत रोखले. पण मुंबई इंडियन्सच्या बेजबाबदार फटके मारले आणि ते बाद झाले. हीच गोष्ट मुंबईच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. रोहित शर्माने देखील सामान संपल्यावर पराभवाचे हेच कारण अधोरेखित केले आहे. त्यामुळे आता मुंबईला पुढचा सामना जिंकायचा असेल तर त्यांना फलंदाजीवर जास्त भर द्यायला लागणार आहे.