अ‍ॅपशहर

नितीश राणाला का बनवलं KKR कर्णधार, जाणून घ्या सर्वात मोठं कारण ठरलं तरी काय

why nitish rana became captain of kkr : केकेआरने नितीश राणाला कर्णधार बनवलं आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी खेळाडू संघात होते. पण तरीही राणाला कर्णधार का बनवण्यात आलं याचं कारण आता समोर आलं आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 27 Mar 2023, 6:46 pm
नवी दिल्ली : अखेर KKR ला कॅप्टन मिळाला. केकेआरने ipl2023 साठी आता नितीश राणाला कर्णधारपद दिले आहे. पण केकेआरपुढे बरेच अनुभवी खेळाडू होते, पण नितीश राणालाच कर्णधारपद का दिलं याचे सर्वात मोठं कारण आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ipl 2023
सौजन्य-बीसीसीआय

View this post on Instagram A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

केकेआरच्या संघाचे कर्णधारपद यापूर्वी पॅट कमिन्सकडे होते. पण कमिन्स मायदेशी परतला आणि त्यानंतर श्रेयस अय्यर कर्णधार होईल, असे समोर आले होते. पण त्यानंतर श्रेयसला गंभीर दुखापत झाली आणि आता तो आयपीएलच खेळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता कर्णधार करायचे तर कोणाला, हा प्रश्न केकेआरच्या संघाला पडला होता. पण त्यांनी अखेर नितीश राणाला कर्णधार का केले, याचे कारण आता समोर आले आहे. कारण राणाकडे जास्त अनुभव नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असलेले खेळाडू संघात आहेत, पण तरीही राणा कर्णधार का, याचे कारण आता समोर आले आहे.

नितीशपेक्षा संघात अनुभवी खेळाडू आहेत. केकेआरच्या संघात आंद्रे रसेलसारखा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचबरोबर बांगलादेशचे कर्णधारपद ज्याने भूषवले आहे तो शकिब अल हसनही केकेआरकडे आहे. या दोघांपेक्षा जास्त अनुभव असलेला वेस्ट इंडिजचा सुनील नरिनही त्यांच्या संघात आहे. या तिघांकडे आंतरराष्ट्रीय क्रिकटचा दांडगा अनुभव आहे, पण तरीही या तिघांकडे केकेआरने नेतृत्व सोपवले नाही. केकेआरला जर भारतीय खेळाडू कर्णधार म्हणून हवा होता तर त्यांच्याकडे शार्दुल ठाकूरही होता. पण तरीही त्यांनी नितीशला कर्णधार का बनवले, हे आता समोर आले आहे.

नितीश हा एक भारताचा खेळाडू आहे. त्याच्याकडे रसेल, शकिब, नरिनसारखा अनुभव नाही. पण हे तिन्ही खेळाडू अजून किती काळ क्रिकेट खेळू शकतात, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पहिली गोष्ट तर भविष्यासाठी एक चांगला कर्णधार आपल्याकडे असावा, हे केकेआरने ठरवले असेल. त्याचबरोबर ज्याला आपण श्रेयस किंवा कमिन्स संघात आल्यावर सहजपणे बाजूला करू शकतो आणि कोणतीही समस्य येणार नाही, याचा विचारही केकेआरने केला आहे.

केकेआरने यावेळी एका दगडात केकेआरने दोन पक्षी मारली आहेत.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज