अ‍ॅपशहर

'मला जनावरासारखं वाटतं, जिथे तुम्हाला खरेदी केलं जातं'; भारतीय खेळाडूचा IPLला घरचा आहेर

Robin Uthappa On Ipl Auction: आयपीएल लिलावात ज्याला दोन कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले अशा एका भारतीय क्रिकेटपटूने लिलाव प्रक्रिये संदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2022, 1:35 pm
नवी दिल्ली: आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी या महिन्याच्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव झाला. या लिलावात अनेक खेळाडूंना मोठी बोली लावण्यात आली. लिलावाच्या काही दिवसानंतर चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केलेल्या रॉबिन उथप्पाने आयपीएल संदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वर्षी चेन्नई सुपर किंग्जने त्याला दोन कोटी या बेस प्राईसला खरेदी केलेले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम टाटा आयपीएल २०२२


वाचा-त्याला माफ केले, कोणाचे करीअर खराब करायचे नाही: साहा

आयपीएलमधील लिलावाबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला, लिलावाची ही प्रक्रिया म्हणजे माझ्या सारख्याला जनावरासारखे वाटते. त्याने लिलावाची तुलना परीक्षा झाल्यानंतरच्या निकालाशी देखील केली. त्याच्या मते आयपीएलमध्ये लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यापेक्षा ड्राफ्ट सिस्टिम सुरू करावी असा सल्ला देखील त्याने दिला.


वाचा- कोच द्रविड, तुमच्या बद्दलचा आदर आणखी वाढला; साहाने केलेल्या आरोपावर पाहा काय म्हणाले

लिलाव हा मला परीक्षेसारखा वाटतो. अशी परीक्षा जी तुम्ही खुप आधी दिली असते आणि फक्त निकालाची प्रतिक्षा करत असता. मला तर जनावरासारखे वाटते. हे बघून चांगले वाटत नाही. मला वाटते की भारताच असे होत असेल. कोणात्या कामगिरीवर चर्चा होणे वेगळी गोष्ट असते आणि एखादा खेळाडू किती रुपयांना विकला गेला याची चर्चा होने ही फार वेगळी गोष्ट ठरते, असे त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

वाचा- मालिका विजयापेक्षा कर्णधार रोहितला कोणत्या गोष्टीचा जास्त आनंद झाला; जाणून घ्या...

तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही की ज्या खेळाडूंना कोणी विकत घेत नाही त्याची अवस्था काय होते. ज्यांना लिलावात कोणी बोली लावली नाही त्याच्या सोबत माझ्या संवेदना आहेत. अनेक वेळा यामुळे निराशा होते.सर्वांच्या भल्याचे हेच आहे की ड्राफ्ट सिस्टम हवी.

वाचा- रोहितचा मिडास टच; मालिका विजायनंतर भारताला मिळाली आनंदाची बातमी

रॉबिन उथप्पाने आयपीएल २०२२सह करिअरचा अखेर करायची इच्छा व्यक्त केली. आयपीएलच्या गेल्या हंगामात त्याने क्वालिफायलमध्ये ४४ चेंडूत ६३ धावा केल्या होत्या. तर अंतिम सामन्यात कोलकाताविरुद्ध १५ चेंडूत ३१ धावांची खेळी केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज