आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. स्पर्धेत एका पाठोपाठ एक खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागले. पण या निर्णयामागे सरकारचा हस्तक्षेप असल्याचे समोर येत आहे. जाणून घेऊयात घटनाक्रम...
काल सोमवारी म्हणजेच ३ मे रोजी कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडूचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर यांना करोना झाला.
या दोन खेळाडूंना करोना झाल्याने सोमवारी होणारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ही लढत स्थगित करण्यात आली.
त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील गोलंदाजीचे कोच बालाजी, संघाचे सीईओ काशी विश्वनाथन आणि बसचा क्लिनर यांना करोना झाला.
दोन संघातील करोना वृत्तापाठोपाठ दिल्लीतील अरुण जेठली मैदानातील पाच ग्राउड स्टाफला करोना झाल्याचे वृत्त समोर आले.
आज मंगळवारी सकाळी बीसीसीआयने मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद ही लढत होणार असल्याचे जाहीर केले.
थोड्याच वेळात सनरायझर्स हैदराबादचा विकेटकिपर वृद्धीमान साहा याला करोनाची लागण झाल्याचे वृत्त आले.
CSKचे गोलंदाजीचे कोच बालाजीला करोना झाल्याने बुधवारी होणारी चेन्नई विरुद्ध राजस्थान मॅच स्थगित केली
बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलच्या तातडीच्या बैठकीत स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.
स्थगितीच्या काही वेळातच दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा याला करोना झाल्याचे समोर आले.
बायो बबलमध्ये करोना झाल्याने स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करून पुन्हा सुरू करण्याचा विचार होता. पण सरकारने हस्तेक्षेप करत आता स्पर्धा सुरू ठेवता येणार नाही, असा निरोप बीसीसीआयला दिल्याने अखेर स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला.