वृत्तसंस्था, डर्बी
‘वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्यासाठी या स्पर्धेतील प्रवास सोपा नव्हता. मात्र, अवघड परिस्थितीत संघातील प्रत्येकाने आपले योगदान दिले. इंग्लंडला साखळीत पराभूत केले असले, तरी अंतिम लढत आव्हानात्मक असेल,’ अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे ती भारताची कर्णधार मिताली राजने. भारताने आपल्या मिशन वर्ल्डकपला इंग्लंडवर मात करूनच सुरुवात केली. ही सलामीची लढत भारताने ३५ धावांनी जिंकली होती. त्यामुळे भारतीय महिला पुन्हा इंग्लंडला नमवतील, असा विश्वास चाहत्यांना वाटू लागला आहे. मात्र, मिताली राजच्या मते ही लढत तेवढी सोपी नसेल. ती म्हणाली, ‘इंग्लंडविरुद्धची लढत सोपी नसेल. त्या दिवशी आमची कामगिरी कशी होते, यावर सारे काही अवलंबून असेल. आम्हाला आमच्या योजनांवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण, पहिल्या लढतीतील पराभवानंतर इंग्लंडने सलग सात लढती जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. यजमान इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणे आव्हानात्मक असेल.’
साखळीतील अखेरच्या लढतीत भारताने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला. हा विजय भारतीय महिलांचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला. त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियालाही धूळ चारली. ही मोठी कामगिरी असल्याचे मितालीने सांगितले. ती म्हणाली, ‘हरमनप्रीतने ज्या पद्धतीने खेळी केली, तशा खेळी पुन्हा पुन्हा बघायला मिळत नाहीत. त्यानंतर आमच्या गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. झूलन, शिखा यांच्यासह फिरकी गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी उत्तम निभावली.’
हरमनप्रीत कौर अफलातूनच खेळली. आम्ही तिला रोखूच शकलो नाहीत. या विजयाबद्दल भारताचे अभिनंदन! आमची सुरुवात मनासारखी झाली नाही. यानंतर ठराविक अंतराने आम्ही विकेट गमावल्या. आमच्यासाठी निराशाजनक शेवट राहिला.
मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलियाची कॅप्टन
‘वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्यासाठी या स्पर्धेतील प्रवास सोपा नव्हता. मात्र, अवघड परिस्थितीत संघातील प्रत्येकाने आपले योगदान दिले. इंग्लंडला साखळीत पराभूत केले असले, तरी अंतिम लढत आव्हानात्मक असेल,’ अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे ती भारताची कर्णधार मिताली राजने. भारताने आपल्या मिशन वर्ल्डकपला इंग्लंडवर मात करूनच सुरुवात केली. ही सलामीची लढत भारताने ३५ धावांनी जिंकली होती. त्यामुळे भारतीय महिला पुन्हा इंग्लंडला नमवतील, असा विश्वास चाहत्यांना वाटू लागला आहे. मात्र, मिताली राजच्या मते ही लढत तेवढी सोपी नसेल. ती म्हणाली, ‘इंग्लंडविरुद्धची लढत सोपी नसेल. त्या दिवशी आमची कामगिरी कशी होते, यावर सारे काही अवलंबून असेल. आम्हाला आमच्या योजनांवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण, पहिल्या लढतीतील पराभवानंतर इंग्लंडने सलग सात लढती जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. यजमान इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणे आव्हानात्मक असेल.’
साखळीतील अखेरच्या लढतीत भारताने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला. हा विजय भारतीय महिलांचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला. त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियालाही धूळ चारली. ही मोठी कामगिरी असल्याचे मितालीने सांगितले. ती म्हणाली, ‘हरमनप्रीतने ज्या पद्धतीने खेळी केली, तशा खेळी पुन्हा पुन्हा बघायला मिळत नाहीत. त्यानंतर आमच्या गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. झूलन, शिखा यांच्यासह फिरकी गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी उत्तम निभावली.’
हरमनप्रीत कौर अफलातूनच खेळली. आम्ही तिला रोखूच शकलो नाहीत. या विजयाबद्दल भारताचे अभिनंदन! आमची सुरुवात मनासारखी झाली नाही. यानंतर ठराविक अंतराने आम्ही विकेट गमावल्या. आमच्यासाठी निराशाजनक शेवट राहिला.
मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलियाची कॅप्टन