म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
भारताची झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तब्बल पंधरा वर्षांचा अनुभव गाठीशी असलेली क्रिकेटपटू. तरीदेखील आजही क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर खेळताना तिचे अंग शहारते, ती रोमांचीत होते. मग तिथे हरमनप्रीत, पूनम राऊत अशा आताच्या तरुण खेळाडू तर नव्हर्सही होतील. वर्ल्डकपमध्ये छाप पाडत, उपविजेतेपद पटकावलेला हा मिताली राजचा भारतीय संघ बुधवारी भल्या पहाटे भारतात परतला.
दुपारी सेव्हन स्टार हॉटेलच्या लखलखत्या हॉलमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना झुलन गोस्वामी, हरमनप्रीतसिंग यांनी लॉर्डस आणि त्यावर रंगलेल्या फायनलचा आवर्जून उल्लेख केला. अर्थात पत्रकारांचे हे ‘अटेंशन’ त्यांना नवे असल्याने त्यांची उत्तरे पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे सफाईदार अन् असल्खित नव्हती. त्यात प्रामाणिकपणा मात्र होता.
लॉर्डसबाबत झुलन म्हणाली, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दडपण असतेच, आपली कामगिरी कशी होईल? संघाला विजय मिळवून देण्यासाठी काय करावे लागेल, अशा विचारांचे चक्र सतत डोक्यात फिरत असते. त्यात लॉर्डसवर सामना म्हणजे उत्सुकता शिगेला पोहोचते. लॉर्डसवर खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे अन् खासकरून क्रिकेटपटूचे स्वप्न असते. २००१मध्ये मी पहिल्यांदा पर्यटक म्हणून लॉर्डसवर गेले होते. तेव्हा तिथले गवतही स्वतःसोबत घेऊन आले होते. त्यावेळी कल्पनाही नव्हती की मला कधी तरी या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची येथील ड्रेसिंगरूममध्ये येण्याची संधी मिळेल. सुदैवाने मला क्रिकेटच्या या पंढरीत देशाचे प्रतिनिधित्व करता आले. २००६, २०१२मध्ये खेळलो. त्यानंतर तेथील एक सामना पावसामुळे वाया गेला होता. हे मैदान आम्हाला फळलेदेखील आहे. त्यात वर्ल्डकपसारखी मानाची मोठी स्पर्धा आणि लॉर्डससारखे स्टेडियम असा योग जुळून आल्याने खूप मजा येत होत होती. दुर्दैवाने आम्हाला जेतेपद पटकावता आले नाही...’ झुलनचे उत्तर विस्तृत अन् थेट मनातून आलेले असते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ९० धावांची खेळी करणारी स्मृतीही झुलनप्रमाणेच लॉर्डसच्या प्रेमात आहे. तिला पहिला प्रश्न आलो तोच, ‘तूझ्या सांगली ते लॉर्डस या प्रवासाबाबत सांग...’ असा. यावर स्मृती म्हणाली, ‘मला आठवतेय की, दुर्दैवाने २०१४मध्ये या मैदानावरील आमचा सामना पावसामुळे वाया गेला होता; पण झुलू दीने (झुलन गोस्वामी) मला व शिखाला (शिखा पांडे) सांगितले होते की, चिंता करू नका, २०१७च्या वर्ल्डकपची फायनल लॉर्डसवर रंगणार आहे. मेहनत करा, चांगले खेळलात तर तिथे खेळण्याची संधी आपोआपच मिळेल. झुलू दीचे म्हणणे खरे ठरले. प्रत्येकाचे स्वप्न असते या मैदानावर खेळण्याचे. मीदेखील त्याला अपवाद नाही. त्यात इंग्लंडविरुद्धच्या फायनलमध्ये स्टेडियम तुडूंब होते, अशा खिलाडूवृत्तीच्या प्रेक्षकांपुढे खेळण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा आनंदही मोठा आहे’.
भारताची झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तब्बल पंधरा वर्षांचा अनुभव गाठीशी असलेली क्रिकेटपटू. तरीदेखील आजही क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर खेळताना तिचे अंग शहारते, ती रोमांचीत होते. मग तिथे हरमनप्रीत, पूनम राऊत अशा आताच्या तरुण खेळाडू तर नव्हर्सही होतील. वर्ल्डकपमध्ये छाप पाडत, उपविजेतेपद पटकावलेला हा मिताली राजचा भारतीय संघ बुधवारी भल्या पहाटे भारतात परतला.
दुपारी सेव्हन स्टार हॉटेलच्या लखलखत्या हॉलमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना झुलन गोस्वामी, हरमनप्रीतसिंग यांनी लॉर्डस आणि त्यावर रंगलेल्या फायनलचा आवर्जून उल्लेख केला. अर्थात पत्रकारांचे हे ‘अटेंशन’ त्यांना नवे असल्याने त्यांची उत्तरे पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे सफाईदार अन् असल्खित नव्हती. त्यात प्रामाणिकपणा मात्र होता.
लॉर्डसबाबत झुलन म्हणाली, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दडपण असतेच, आपली कामगिरी कशी होईल? संघाला विजय मिळवून देण्यासाठी काय करावे लागेल, अशा विचारांचे चक्र सतत डोक्यात फिरत असते. त्यात लॉर्डसवर सामना म्हणजे उत्सुकता शिगेला पोहोचते. लॉर्डसवर खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे अन् खासकरून क्रिकेटपटूचे स्वप्न असते. २००१मध्ये मी पहिल्यांदा पर्यटक म्हणून लॉर्डसवर गेले होते. तेव्हा तिथले गवतही स्वतःसोबत घेऊन आले होते. त्यावेळी कल्पनाही नव्हती की मला कधी तरी या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची येथील ड्रेसिंगरूममध्ये येण्याची संधी मिळेल. सुदैवाने मला क्रिकेटच्या या पंढरीत देशाचे प्रतिनिधित्व करता आले. २००६, २०१२मध्ये खेळलो. त्यानंतर तेथील एक सामना पावसामुळे वाया गेला होता. हे मैदान आम्हाला फळलेदेखील आहे. त्यात वर्ल्डकपसारखी मानाची मोठी स्पर्धा आणि लॉर्डससारखे स्टेडियम असा योग जुळून आल्याने खूप मजा येत होत होती. दुर्दैवाने आम्हाला जेतेपद पटकावता आले नाही...’ झुलनचे उत्तर विस्तृत अन् थेट मनातून आलेले असते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ९० धावांची खेळी करणारी स्मृतीही झुलनप्रमाणेच लॉर्डसच्या प्रेमात आहे. तिला पहिला प्रश्न आलो तोच, ‘तूझ्या सांगली ते लॉर्डस या प्रवासाबाबत सांग...’ असा. यावर स्मृती म्हणाली, ‘मला आठवतेय की, दुर्दैवाने २०१४मध्ये या मैदानावरील आमचा सामना पावसामुळे वाया गेला होता; पण झुलू दीने (झुलन गोस्वामी) मला व शिखाला (शिखा पांडे) सांगितले होते की, चिंता करू नका, २०१७च्या वर्ल्डकपची फायनल लॉर्डसवर रंगणार आहे. मेहनत करा, चांगले खेळलात तर तिथे खेळण्याची संधी आपोआपच मिळेल. झुलू दीचे म्हणणे खरे ठरले. प्रत्येकाचे स्वप्न असते या मैदानावर खेळण्याचे. मीदेखील त्याला अपवाद नाही. त्यात इंग्लंडविरुद्धच्या फायनलमध्ये स्टेडियम तुडूंब होते, अशा खिलाडूवृत्तीच्या प्रेक्षकांपुढे खेळण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा आनंदही मोठा आहे’.