महाराष्ट्राचा दुसरा विजय
पुणे : महाराष्ट्राने ६६व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्राने राजस्थानवर २८-२४ असा विजय नोंदविला. यासह महाराष्ट्राने बाद फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले. आता केरळ संघा बरोबर आपला शेवटचा साखळी सामना बाकी आहे. बिहारमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्राने दमदार सुरुवात करीत मध्यंतराला १८-११ अशी आघाडी घेतली होती. पण, मध्यंतरानंतर मात्र राजस्थानने आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्राला चांगलेच झुंजविले. शेवटी ४ गुणांनी महाराष्ट्राने हा सामना जिंकला. स्नेहल शिंदे, सायली केरीपाळे, अंकिता जगताप यांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला.
इतर सामन्यांचे निकाल : पश्चिम बंगाल युनिट वि वि चंदीगड ३१-१८; ओडिशा वि. वि. आसाम ५०-१९; हरियाणा वि. वि. मणिपूर ५५-२६; उत्तर प्रदेश वि. वि. पुदुच्चेरी ४१-०७; पंजाब वि. वि. झारखंड ५८-१०.