अ‍ॅपशहर

'हा' काश्मिरी खेळाडू ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या-वहिल्या दिव्यांग टी२० वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील एका सामन्यात भारताने पाकिस्तानला आठ विकेट्सने हरवलं आहे. ४३ चेंडूत ६९ धावा करणारा काश्मिरी खेळाडू वसीम इकबाल या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2019, 10:51 am
नवी दिल्ली: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या-वहिल्या दिव्यांग टी२० वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील एका सामन्यात भारताने पाकिस्तानला आठ विकेट्सने हरवलं आहे. ४३ चेंडूत ६९ धावा करणारा काश्मिरी खेळाडू वसीम इकबाल या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kashmiri player becomes indias matchwinner
'हा' काश्मिरी खेळाडू ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार



एकीकडे कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. काश्मीरबद्दल राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशा परिस्थितीत एका काश्मिरी खेळाडूनेच पहिल्या दिव्यांग टी२० वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. या सामन्यांत पाकिस्ताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १५० धावा केल्या. १५१ धावांचं लक्ष्य भारताने सहज १७.२ षटकांमध्ये पूर्ण केलं. वसीम इक्बालने ६९ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा अवार्डही मिळाला.


'हा दिवस माझ्यासाठी खास आहे'

'ईदच्या दिवशी हा विजय मिळाला आहे. मला मॅन ऑफ द मॅच अवार्ड मिळाला आहे. हा दिवस आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे.' असं वसीम इक्बालने सांगितलं आहे. वसीम इक्बाल मुळचा अनंतनागचा रहिवाशी आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर त्याचाही कुटंबियांशी संपर्क झालेला नाही'.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज