अ‍ॅपशहर

मितालीला वगळल्याची खंत नाही !

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय महिलांना स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाला मिताली राजची अनुपस्थिती कारणीभूत असल्याची चर्चा होत असली तरी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या मते मिताली संघात नव्हती याचे दुःख नाही. कारण संघाचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला होता.

PTI 24 Nov 2018, 12:21 am
हरमनने निर्णयाचे केले समर्थन; संघाचा निर्णय असल्याचे मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mithila does not have to worry
मितालीला वगळल्याची खंत नाही !


वृत्तसंस्था, नॉर्थ साऊंड

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय महिलांना स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाला मिताली राजची अनुपस्थिती कारणीभूत असल्याची चर्चा होत असली तरी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या मते मिताली संघात नव्हती याचे दुःख नाही. कारण संघाचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला होता.

इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्डकप टी-२० उपांत्य सामन्यात भारताचा डाव अवघ्या ११२ धावांत आटोपल्यानंतर भारताला हा पराभव पत्करावा लागला. त्याला मिताली राजचे संघात नसणे हेदेखील कारणीभूत असल्याचे बोलले जाऊ लागले.हरमन सामन्यानंतर म्हणाली की, मितालीची निवड महत्त्वाची नाही तर आम्हाला विजयी संघ कायम ठेवायचा होता हे अधिक महत्त्वाचे होते. मितालीसंदर्भात समालोचक व इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन तसेच भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनीही आश्चर्य व्यक्त केले. हरमन मात्र मितालीला वगळण्याच्या निर्णयाचे समर्थन करत होती. ती म्हणाली की, जो काही निर्णय आम्ही घेतला तो संघासाठी होता. काहीवेळा एखादा निर्णय फलदायी ठरतो कधी ठरत नाही. त्यामुळे त्याची खंत बाळगण्याची गरज नाही. या स्पर्धेत आपल्या संघाने जो खेळ केला, त्याचे मला कौतुक आहे.

सलामीची फलंदाज तानिया भाटिया आणि वेदा कृष्णमूर्ती यांचा हरवलेला सूर लक्षात घेता मितालीला संधी द्यायला हवी होती, असा सूरही आळवला जात होता. हरमन म्हणाली की, आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी केली, त्यामुळे तोच संघ कायम ठेवण्याचे आम्ही ठरविले. पण आम्ही जर चांगली गोलंदाजी केली असती तर सामना आम्ही जिंकू शकलो असतो. शिवाय, जर आमच्या गाठीशी १४०-१५० धावा असत्या तरीही आम्हाला जिंकणे शक्य झाले असते. मोठ्या स्पर्धांत आमची मानसिक कसोटी लागते, हे देखील हरमनने मान्य केले. आमच्या तरुण खेळाडूंच्या संघाने त्यावर मेहनत घ्यायला हवी, असेही ती म्हणाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज