मुंबई:
मुंबई क्रिकेटने कायमच भारतीय क्रिकेटचे प्रतिनिधित्व केले आहे आणि भारतीय संघात दाखल झालेले मुंबईकर क्रिकेटपटूंचे आकडेच, याबाबतचा मोठा पुरावा आहे. आता टी-२० क्रिकेटच्या निमित्ताने आणखी काही मुंबईकरांना चांगले व्यासपीठ मिळणार आहे,’ असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
मुंबईत पुढील महिन्यात मुंबई टी-२० क्रिकेट लीग होणार आहे. ही स्पर्धा ११ ते २१ मार्चदरम्यान होणार असून, या लीगला मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता आहे. सचिन तेंडुलकर हा या लीगचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या लीगचे महत्त्व युवा खेळाडूंना सचिनने पटवून दिले. तो म्हणाला, ‘आगामी टी-२० मुंबई क्रिकेट लीग म्हणजे युवा क्रिकेटपटूंसाठी चांगले व्यासपीठ ठरणार आहे. मुंबई क्रिकेटसाठी अशा लीगची गरजच होती. या लीगचा भाग असल्याने मी स्वत:ला नशिबवान समजतो.’ मुंबई संघाने रणजी करंडक ४१वेळा उंचावला आहे. या लीगमुळे मुंबई संघ आणखी मजबूत होईल आणि गुणवान खेळाडू समोर येतील असा विश्वास सचिनला वाटतो. तो म्हणाला, ‘मुंबई क्रिकेटमधील काही अव्वल खेळाडूंसह नवोदितांना खेळायला मिळेल. याचा त्यांना कारकिर्दीत निश्चित फायदा होईल.’ मुंबईतून भारतीय संघाला सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त अजित वाडेकर, सुनील गावसकर, चंद्रकांत पंडित, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, प्रवीण आम्रे, विनोद कांबळी यांच्यापासून ते अलीकडील रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूरपर्यंत अनेक खेळाडू मिळाले.
मुंबईमधील अनेक खेळाडू असे होते ज्यांनी चांगली कामगिरी केली; पण त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही, याकडेही सचिनने लक्ष वेधले. सचिन म्हणाला, ‘मुंबई क्रिकेटमध्ये त्या वेळी अनेक जण चांगली कामगिरी करीत होते. भारतीय संघाकडून खेळण्याची त्याची क्षमता होती. पण त्या वेळी संघात त्यांच्यासाठी स्थानच उपलब्ध नव्हते. आताही तिच स्थिती आहे. अनेक क्लबमध्ये असे खेळाडू आहेत, ज्यांची रणजी संघात खेळण्याची क्षमता आहे. अर्थात, लीगमधून रणजी संघात प्रवेश मिळाला नाही, तरी ही लीग आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी खेळाडूंना चांगले व्यासपीठ ठरेल. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्याही खेळाडूंना याचा फायदा होईल. आणि आपण आर्थिकदृष्ट्या कुटुंबाला हातभार लावू शकलो, याचा प्रत्येक खेळाडूला अभिमान वाटेल.’
मुंबई क्रिकेटने कायमच भारतीय क्रिकेटचे प्रतिनिधित्व केले आहे आणि भारतीय संघात दाखल झालेले मुंबईकर क्रिकेटपटूंचे आकडेच, याबाबतचा मोठा पुरावा आहे. आता टी-२० क्रिकेटच्या निमित्ताने आणखी काही मुंबईकरांना चांगले व्यासपीठ मिळणार आहे,’ असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
मुंबईत पुढील महिन्यात मुंबई टी-२० क्रिकेट लीग होणार आहे. ही स्पर्धा ११ ते २१ मार्चदरम्यान होणार असून, या लीगला मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता आहे. सचिन तेंडुलकर हा या लीगचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या लीगचे महत्त्व युवा खेळाडूंना सचिनने पटवून दिले. तो म्हणाला, ‘आगामी टी-२० मुंबई क्रिकेट लीग म्हणजे युवा क्रिकेटपटूंसाठी चांगले व्यासपीठ ठरणार आहे. मुंबई क्रिकेटसाठी अशा लीगची गरजच होती. या लीगचा भाग असल्याने मी स्वत:ला नशिबवान समजतो.’ मुंबई संघाने रणजी करंडक ४१वेळा उंचावला आहे. या लीगमुळे मुंबई संघ आणखी मजबूत होईल आणि गुणवान खेळाडू समोर येतील असा विश्वास सचिनला वाटतो. तो म्हणाला, ‘मुंबई क्रिकेटमधील काही अव्वल खेळाडूंसह नवोदितांना खेळायला मिळेल. याचा त्यांना कारकिर्दीत निश्चित फायदा होईल.’ मुंबईतून भारतीय संघाला सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त अजित वाडेकर, सुनील गावसकर, चंद्रकांत पंडित, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, प्रवीण आम्रे, विनोद कांबळी यांच्यापासून ते अलीकडील रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूरपर्यंत अनेक खेळाडू मिळाले.
मुंबईमधील अनेक खेळाडू असे होते ज्यांनी चांगली कामगिरी केली; पण त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही, याकडेही सचिनने लक्ष वेधले. सचिन म्हणाला, ‘मुंबई क्रिकेटमध्ये त्या वेळी अनेक जण चांगली कामगिरी करीत होते. भारतीय संघाकडून खेळण्याची त्याची क्षमता होती. पण त्या वेळी संघात त्यांच्यासाठी स्थानच उपलब्ध नव्हते. आताही तिच स्थिती आहे. अनेक क्लबमध्ये असे खेळाडू आहेत, ज्यांची रणजी संघात खेळण्याची क्षमता आहे. अर्थात, लीगमधून रणजी संघात प्रवेश मिळाला नाही, तरी ही लीग आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी खेळाडूंना चांगले व्यासपीठ ठरेल. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्याही खेळाडूंना याचा फायदा होईल. आणि आपण आर्थिकदृष्ट्या कुटुंबाला हातभार लावू शकलो, याचा प्रत्येक खेळाडूला अभिमान वाटेल.’