रायपूर : दुखापतीमुळे अनेक बदल केलेला मुंबईचा संघ हैदराबादशी आजपासून सुरू होत असलेल्या रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत झुंजणार आहे. रणजी करंडक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर मुंबईची कामगिरी नेहमीच सरस ठरलेली आहे. या संघात एकनाथ केरकर वगळता अन्य खेळाडू रणजी खेळलेले आहेत. प्रफुल्ल वाघेला, केव्हिन अल्मेडा, विजय गोहिल, अक्षय गिरप, रॉयस्टन डायस, सुफियाँ शेख व तुषार देशपांडे यांच्या खात्यात २३ सामने आहेत. मुंबईला सलामीवीर अखिल हेरवाडकरची गैरहजेरी जाणवणार आहे. तर शुभम रांजणे आणि धवल कुलकर्णीचीही उणीव भासेल.
अल्मेडाने पुरुषोत्तम ढाल स्पर्धेत त्रिशतक झळकाविले होते. त्याची दखल निवड समितीने घेतली. त्या सोबत सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, अभिषेक नायर, कर्णधार आदित्य तरे अशी अनुभवी खेळाडूंची फळीही मुंबईकडे आहे. त्यामुळे हैदराबाद कर्णधार एस. बद्रिनाथ पूर्ण ताकदीनिशी मुंबईचा प्रतिकार करण्यास सज्ज आहे. हैदराबादकडे सर्वाधिक बळी घेणारा एम. रवीकिरण हा गोलंदाज आहे. मुंबईविरुद्ध तो कशी कामगिरी करतो हे पाहायचे.
अल्मेडाने पुरुषोत्तम ढाल स्पर्धेत त्रिशतक झळकाविले होते. त्याची दखल निवड समितीने घेतली. त्या सोबत सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, अभिषेक नायर, कर्णधार आदित्य तरे अशी अनुभवी खेळाडूंची फळीही मुंबईकडे आहे. त्यामुळे हैदराबाद कर्णधार एस. बद्रिनाथ पूर्ण ताकदीनिशी मुंबईचा प्रतिकार करण्यास सज्ज आहे. हैदराबादकडे सर्वाधिक बळी घेणारा एम. रवीकिरण हा गोलंदाज आहे. मुंबईविरुद्ध तो कशी कामगिरी करतो हे पाहायचे.