मुंबई:
येत्या २९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या एकदिवसीय सामन्यावर टांगती तलवार लटकली आहे. एमसीएचं बँक खातं सुरू होऊ न शकल्याने स्टेडियममधील जाहिरात आणि खाद्यपदार्थांच्या सुविधा पुरविण्याबाबतच्या निविदा काढता आल्या नाहीत. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या भारत विरुद्ध विंडिजदरम्यानच्या सामन्यावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे.
मुंबईत २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पार्श्वभूमीवर एमसीएच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ही तांत्रिक अडचण समजावून सांगितली. यावेळी व्यवस्थापकीय समितीचे काही सदस्यही उपस्थित होते. २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी स्टेडियममधील जाहिराती, खाद्यपदार्थ, साफसफाई आणि खासगी सुरक्षा देण्याबाबतच्या निविदा सूचना काढण्यात आलेल्या नाहीत. हे बीसीसीआयच्या लक्षात आणून दिल्याचं एका सदस्याने सांगितलं.
दरम्यान, सीओएचे प्रमुख विनोद रॉय यांनी या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली. मुंबईऐवजी इतरत्र वन-डे सामना होईल असे मला म्हणायचे नाही. पण त्यांनी काही तांत्रिक अडचणी सांगितल्या आहेत आणि त्यातून मार्ग काढण्यात येईल, असं रॉय म्हणाले.
एमसीएचे सचिव उन्मेष खानविलकर आणि आणखी एका सदस्याने भारत- वेस्ट इंडिज सामन्यासाठी तदर्थ समिती स्थापन करावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्ते उन्मेष खानविलकर आणि गणेश अय्यर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबतचा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं एका सदस्याने सांगितलं. या वन-डे सामन्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यावाचून कोणताही पर्याय नसल्याचंही या सदस्याने स्पष्ट केलं.
विशाखापट्टनमला सामना होणार
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यानच्या ५ मालिकांच्या एकदिवसीय सामन्यातील दुसरा सामना इंदूरऐवजी विशाखापट्टनमला होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये हा सामना होणार होता. मात्र बीसीसीआय आणि मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशन दरम्यान सामन्याच्या फ्रि पासवरून वाद झाल्याने हा सामना इंदूरऐवजी विशाखापट्टनमला घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
येत्या २९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या एकदिवसीय सामन्यावर टांगती तलवार लटकली आहे. एमसीएचं बँक खातं सुरू होऊ न शकल्याने स्टेडियममधील जाहिरात आणि खाद्यपदार्थांच्या सुविधा पुरविण्याबाबतच्या निविदा काढता आल्या नाहीत. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या भारत विरुद्ध विंडिजदरम्यानच्या सामन्यावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे.
मुंबईत २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पार्श्वभूमीवर एमसीएच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ही तांत्रिक अडचण समजावून सांगितली. यावेळी व्यवस्थापकीय समितीचे काही सदस्यही उपस्थित होते. २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी स्टेडियममधील जाहिराती, खाद्यपदार्थ, साफसफाई आणि खासगी सुरक्षा देण्याबाबतच्या निविदा सूचना काढण्यात आलेल्या नाहीत. हे बीसीसीआयच्या लक्षात आणून दिल्याचं एका सदस्याने सांगितलं.
दरम्यान, सीओएचे प्रमुख विनोद रॉय यांनी या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली. मुंबईऐवजी इतरत्र वन-डे सामना होईल असे मला म्हणायचे नाही. पण त्यांनी काही तांत्रिक अडचणी सांगितल्या आहेत आणि त्यातून मार्ग काढण्यात येईल, असं रॉय म्हणाले.
एमसीएचे सचिव उन्मेष खानविलकर आणि आणखी एका सदस्याने भारत- वेस्ट इंडिज सामन्यासाठी तदर्थ समिती स्थापन करावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्ते उन्मेष खानविलकर आणि गणेश अय्यर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबतचा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं एका सदस्याने सांगितलं. या वन-डे सामन्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यावाचून कोणताही पर्याय नसल्याचंही या सदस्याने स्पष्ट केलं.
विशाखापट्टनमला सामना होणार
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यानच्या ५ मालिकांच्या एकदिवसीय सामन्यातील दुसरा सामना इंदूरऐवजी विशाखापट्टनमला होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये हा सामना होणार होता. मात्र बीसीसीआय आणि मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशन दरम्यान सामन्याच्या फ्रि पासवरून वाद झाल्याने हा सामना इंदूरऐवजी विशाखापट्टनमला घेण्याचा निर्णय घेण्यात आला.