वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भविष्यातील दौरे आणि क्रिकेट कार्यक्रमाच्या प्रस्तावित आराखड्यात टी-२० क्रिकेटला भरपूर वाव देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी नव्या कार्यक्रमासंदर्भात जो प्रस्ताव मांडला आहे, पुढील पाच वर्षांत २७ टी-२० सामन्यांसह ८१ आंतरराष्ट्रीय सामने भारतात खेळले जातील. टी-२० सामन्यांची एकूण संख्या ५३ असून त्यातील २६ सामने परदेशात खेळले जाणार आहेत.
जोहरी यांनी सांगितले की, आम्ही सर्वांशी चर्चा केली आणि लक्षात आले की, टी-२० च्या मोजक्या सामन्यांना काही अर्थ नाही. जर तिथे योग्य प्रमाणात स्पर्धा असेल तरच उपयोग. म्हणूनच या नव्या प्रस्तावात भरपूर टी-२० सामन्यांचा समावेश करण्याचे आम्ही ठरविले.
जोहरी यांनी या नव्या प्रस्तावासंदर्भात काही महिने काम केले आहे आणि आता त्याला आयसीसीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात नवे प्रसारण हक्क अस्तित्वात येणार असल्यामुळे त्या अनुषंगाने क्रिकेटचा नवा कार्यक्रमही आखण्यात आला आहे, असे जोहरी म्हणाले. आयपीएलच्या प्रसारणासाठी स्टार इंडियाकडून बोर्डाला १६,३४७ कोटी इतकी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे आयपीएलप्रमाणे अन्य क्रिकेट सामन्यांचीही मेजवानी क्रिकेटचाहत्यांना मिळावी असा हा प्रस्ताव आहे. प्रसारण करणाऱ्या कंपनीला पूर्ण संधी मिळावी, असाच प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
या नव्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार भारत एकूण ३७ कसोटी सामने खेळणार आहे. त्यातील १९ भारतात तर १८ परदेशात होतील.
जोहरी म्हणाले की, कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायचे असल्यामुळे या ३७पैकी अर्ध्याअधिक लढती इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. शिवाय, आयपीएलदरम्यान कोणतेही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असता कामा नये, याचाही विचार आम्ही केला आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डही आयपीएलचा हिस्सा असेल.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे की, प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेट हे भवितव्य आहे.
गेले १८ महिने जोहरी हे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. या कालावधीत त्यांचे बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांशी संबंध ताणले गेल्याचे वृत्त होते. पण जोहरी यांच्या मते गेल्या १८ महिन्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, मात्र सर्वांशी आपले संबंध उत्तम होते.
भविष्यातील दौरे आणि क्रिकेट कार्यक्रमाच्या प्रस्तावित आराखड्यात टी-२० क्रिकेटला भरपूर वाव देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी नव्या कार्यक्रमासंदर्भात जो प्रस्ताव मांडला आहे, पुढील पाच वर्षांत २७ टी-२० सामन्यांसह ८१ आंतरराष्ट्रीय सामने भारतात खेळले जातील. टी-२० सामन्यांची एकूण संख्या ५३ असून त्यातील २६ सामने परदेशात खेळले जाणार आहेत.
जोहरी यांनी सांगितले की, आम्ही सर्वांशी चर्चा केली आणि लक्षात आले की, टी-२० च्या मोजक्या सामन्यांना काही अर्थ नाही. जर तिथे योग्य प्रमाणात स्पर्धा असेल तरच उपयोग. म्हणूनच या नव्या प्रस्तावात भरपूर टी-२० सामन्यांचा समावेश करण्याचे आम्ही ठरविले.
जोहरी यांनी या नव्या प्रस्तावासंदर्भात काही महिने काम केले आहे आणि आता त्याला आयसीसीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात नवे प्रसारण हक्क अस्तित्वात येणार असल्यामुळे त्या अनुषंगाने क्रिकेटचा नवा कार्यक्रमही आखण्यात आला आहे, असे जोहरी म्हणाले. आयपीएलच्या प्रसारणासाठी स्टार इंडियाकडून बोर्डाला १६,३४७ कोटी इतकी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे आयपीएलप्रमाणे अन्य क्रिकेट सामन्यांचीही मेजवानी क्रिकेटचाहत्यांना मिळावी असा हा प्रस्ताव आहे. प्रसारण करणाऱ्या कंपनीला पूर्ण संधी मिळावी, असाच प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
या नव्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार भारत एकूण ३७ कसोटी सामने खेळणार आहे. त्यातील १९ भारतात तर १८ परदेशात होतील.
जोहरी म्हणाले की, कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायचे असल्यामुळे या ३७पैकी अर्ध्याअधिक लढती इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. शिवाय, आयपीएलदरम्यान कोणतेही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असता कामा नये, याचाही विचार आम्ही केला आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डही आयपीएलचा हिस्सा असेल.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे की, प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेट हे भवितव्य आहे.
गेले १८ महिने जोहरी हे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. या कालावधीत त्यांचे बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांशी संबंध ताणले गेल्याचे वृत्त होते. पण जोहरी यांच्या मते गेल्या १८ महिन्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, मात्र सर्वांशी आपले संबंध उत्तम होते.