नवी दिल्ली:
आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाकडे पर्यायांची कमतरता नाही, असे वक्तव्य भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. गरजेनुसार संघात बदल करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
भारतीय संघाच्या भात्यात अनेक बाण आहेत. तसेच आगामी विश्वचषकासाठी संघात परिस्थितीनुसार सकारात्मक बदल केले जाऊ शकतात, असे संकेत संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत.
विजय शंकर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येणार का? या प्रश्नावर उत्तर देताना, कोणत्याही खेळाडूचा क्रम अजून निश्चित नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संघ लवचिक आहे. गरजेनुसारच बदल केले जातील. चौथ्या विकेटसाठी खेळायला अनेक खेळाडू तयार आहेत. त्याची चिंता नाही, असे रवी शास्त्री यांनी म्हटले.
एका मुलाखतीदरम्यान, संघातील १५ खेळाडू कधीही आणि कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतात. ऐनवेळी एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास त्याचाही पर्याय उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. विश्वचषकाला अजून बराच अवधी आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये गरजेनुसार निर्णय घ्यावे लागतात. तयारीसाठी चार वर्षांचा कालावधी असला तरीही ऐनवेळी निर्णय बदलावे लागतात, असे ते म्हणाले.
मागील विश्वचषकातील वेस्ट इंडिजच्या प्रदर्शनावरही त्यांनी टिप्पणी केली. ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजच्या संघाने चांगली कामगिरी केल्याचे शास्त्रींनी सांगितले. ३०मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे.
आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाकडे पर्यायांची कमतरता नाही, असे वक्तव्य भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. गरजेनुसार संघात बदल करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
भारतीय संघाच्या भात्यात अनेक बाण आहेत. तसेच आगामी विश्वचषकासाठी संघात परिस्थितीनुसार सकारात्मक बदल केले जाऊ शकतात, असे संकेत संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत.
विजय शंकर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येणार का? या प्रश्नावर उत्तर देताना, कोणत्याही खेळाडूचा क्रम अजून निश्चित नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संघ लवचिक आहे. गरजेनुसारच बदल केले जातील. चौथ्या विकेटसाठी खेळायला अनेक खेळाडू तयार आहेत. त्याची चिंता नाही, असे रवी शास्त्री यांनी म्हटले.
एका मुलाखतीदरम्यान, संघातील १५ खेळाडू कधीही आणि कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतात. ऐनवेळी एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास त्याचाही पर्याय उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. विश्वचषकाला अजून बराच अवधी आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये गरजेनुसार निर्णय घ्यावे लागतात. तयारीसाठी चार वर्षांचा कालावधी असला तरीही ऐनवेळी निर्णय बदलावे लागतात, असे ते म्हणाले.
मागील विश्वचषकातील वेस्ट इंडिजच्या प्रदर्शनावरही त्यांनी टिप्पणी केली. ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजच्या संघाने चांगली कामगिरी केल्याचे शास्त्रींनी सांगितले. ३०मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे.