मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत १-४ असा पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानी संघासाठी २०१७ हे वर्षं 'खतरा' ठरू शकतं. आयसीसी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या पाकनं या वर्षात कामगिरी न सुधारल्यास त्यांच्यावर वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याची नामुष्की ओढवू शकते.
२०१९चा वर्ल्ड कप इंग्लंडला होणार आहे. या स्पर्धेत फक्त दहा संघच खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे. त्यापैकी आठ संघांना थेट प्रवेश दिला जाईल आणि उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून निवडले जातील. त्यात, यजमान देश असल्यानं इंग्लंडचा प्रवेश निश्चित आहे, तर उरलेल्या सात संघांमध्ये स्थान मिळवून वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला बराच घाम गाळावा लागेल, असं आजचं चित्र आहे.
आयसीसी क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या खात्यात ८९ गुण जमा आहेत. बांगलादेश त्यांच्यापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे, तर विंडीज ८६ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. या तीनही संघांमध्ये टॉप-८ मध्ये राहण्यासाठी येत्या काळात 'काँटे की टक्कर' पाहायला मिळेल. कारण, पुढच्या महिन्यात पाकिस्तान-बांगलादेश यूएईमध्ये आमनेसामने उभे ठाकणार आहेत. त्यांच्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि एक टी-२०ची लढत होणार आहे. त्यानंतर, पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. तिथे यजमान आणि पाहुण्यांमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि दोन टी-२० सामने होणार आहेत. तिथे जर पाकिस्तान ढेपाळलं तर त्यांची क्रमवारीत घसरण होऊ शकते. ती त्यांना परवडणारी नाही. कारण, या दोन दौऱ्यानंतर, १ ते १८ जूनदरम्यान मिनी वर्ल्ड कप मानली जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा इंग्लंडमध्ये होतेय. तिथे तर सगळेच रथी-महारथी खेळणार आहेत. त्यामुळे टॉप-८ मध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना बांगलादेश आणि विंडीजविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील, नाहीतर वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. तो पाकिस्तान क्रिकेटसाठी मोठा धक्का असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत १-४ असा पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानी संघासाठी २०१७ हे वर्षं 'खतरा' ठरू शकतं. आयसीसी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या पाकनं या वर्षात कामगिरी न सुधारल्यास त्यांच्यावर वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याची नामुष्की ओढवू शकते.
२०१९चा वर्ल्ड कप इंग्लंडला होणार आहे. या स्पर्धेत फक्त दहा संघच खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे. त्यापैकी आठ संघांना थेट प्रवेश दिला जाईल आणि उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून निवडले जातील. त्यात, यजमान देश असल्यानं इंग्लंडचा प्रवेश निश्चित आहे, तर उरलेल्या सात संघांमध्ये स्थान मिळवून वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला बराच घाम गाळावा लागेल, असं आजचं चित्र आहे.
आयसीसी क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या खात्यात ८९ गुण जमा आहेत. बांगलादेश त्यांच्यापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे, तर विंडीज ८६ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. या तीनही संघांमध्ये टॉप-८ मध्ये राहण्यासाठी येत्या काळात 'काँटे की टक्कर' पाहायला मिळेल. कारण, पुढच्या महिन्यात पाकिस्तान-बांगलादेश यूएईमध्ये आमनेसामने उभे ठाकणार आहेत. त्यांच्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि एक टी-२०ची लढत होणार आहे. त्यानंतर, पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. तिथे यजमान आणि पाहुण्यांमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि दोन टी-२० सामने होणार आहेत. तिथे जर पाकिस्तान ढेपाळलं तर त्यांची क्रमवारीत घसरण होऊ शकते. ती त्यांना परवडणारी नाही. कारण, या दोन दौऱ्यानंतर, १ ते १८ जूनदरम्यान मिनी वर्ल्ड कप मानली जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा इंग्लंडमध्ये होतेय. तिथे तर सगळेच रथी-महारथी खेळणार आहेत. त्यामुळे टॉप-८ मध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना बांगलादेश आणि विंडीजविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील, नाहीतर वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. तो पाकिस्तान क्रिकेटसाठी मोठा धक्का असेल.