वृत्तसंस्था, मोहाली
दिल्लीचा रिषभ पंत यंदाच्या रणजी मोसमात भरीव कामगिरी करतो आहे. त्यामुळे भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा जायबंदी झाल्यावर पंतला थेट कसोटी संघात प्रवेश देण्याची चर्चा रंगली. मात्र जेव्हा प्रश्न अनुभव आणि यष्टीरक्षणाच्या कौशल्याचा येतो तेव्हा नवोदित पंतपेक्षा पार्थिव पटेलच योग्य ठरतो, असे मत मांडले आहे ते भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी.
कुंबळे यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. ते म्हणतात, ‘पार्थिवचा संघात समावेश झाला असला तरी साहा हाच आमची यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल’. या वक्तव्यावरून मोहाली कसोटी ही पार्थिवला स्वतःला सिद्ध करण्याची एकमेव संधी असेल, असे दिसते आहे. ‘साहा मोहाली कसोटीला मुकणार आहे हे आमचे दुर्दैव आहे. विशाखापट्टणम कसोटीच्या अंतिम दिवशी साहाला त्रास जाणवू लागला. बुधवारीच त्याच्या पायाचा स्कॅन करण्यात आला, त्यात त्याची दुखापत थोडी गंभीर असल्याचे कळले. तेव्हा साहाने विश्रांती घेणेच योग्य आहे’, असे कुंबळे यांनी सांगितले.
पार्थिव पटेलऐवजी दिनेश कार्तिकचा विचारही झाला असता; पण तो यंदाच्या रणजी मोसमात तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करताना यष्टीरक्षण करत नाहीये. अलीकडेच कार्तिकने १६३, ७३, ९५, ६५ आणि ८० अशा धावा केल्या असून पार्थिवने ५३, ६१ आणि १३९ धावांची खेळी केली आहे. फलंदाजीत दिल्लीच्या पंतने ८७४ धावा फटकावल्या असून यात चार शतकांचा समावेश आहे. तसेच यंदाच्या मोसमात पंतने त्रिशतक आणि जलद शतकाचीही नोंद केली आहे. मात्र बीसीसीआयच्या निवड समितीने केलेल्या प्रोटोकॉलनुसार कार्तिकने यष्टीरक्षक म्हणून कामगिरी केली तरच त्याचा संघासाठी विचार होऊ शकतो. हाताला झालेल्या दुखापतीमुळे कार्तिक फक्त फलंदाज म्हणून संघात असल्याचे तामिळनाडू संघातील सुत्रांकडून सांगण्यात आले.
दिल्लीचा रिषभ पंत यंदाच्या रणजी मोसमात भरीव कामगिरी करतो आहे. त्यामुळे भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा जायबंदी झाल्यावर पंतला थेट कसोटी संघात प्रवेश देण्याची चर्चा रंगली. मात्र जेव्हा प्रश्न अनुभव आणि यष्टीरक्षणाच्या कौशल्याचा येतो तेव्हा नवोदित पंतपेक्षा पार्थिव पटेलच योग्य ठरतो, असे मत मांडले आहे ते भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी.
कुंबळे यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. ते म्हणतात, ‘पार्थिवचा संघात समावेश झाला असला तरी साहा हाच आमची यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल’. या वक्तव्यावरून मोहाली कसोटी ही पार्थिवला स्वतःला सिद्ध करण्याची एकमेव संधी असेल, असे दिसते आहे. ‘साहा मोहाली कसोटीला मुकणार आहे हे आमचे दुर्दैव आहे. विशाखापट्टणम कसोटीच्या अंतिम दिवशी साहाला त्रास जाणवू लागला. बुधवारीच त्याच्या पायाचा स्कॅन करण्यात आला, त्यात त्याची दुखापत थोडी गंभीर असल्याचे कळले. तेव्हा साहाने विश्रांती घेणेच योग्य आहे’, असे कुंबळे यांनी सांगितले.
पार्थिव पटेलऐवजी दिनेश कार्तिकचा विचारही झाला असता; पण तो यंदाच्या रणजी मोसमात तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करताना यष्टीरक्षण करत नाहीये. अलीकडेच कार्तिकने १६३, ७३, ९५, ६५ आणि ८० अशा धावा केल्या असून पार्थिवने ५३, ६१ आणि १३९ धावांची खेळी केली आहे. फलंदाजीत दिल्लीच्या पंतने ८७४ धावा फटकावल्या असून यात चार शतकांचा समावेश आहे. तसेच यंदाच्या मोसमात पंतने त्रिशतक आणि जलद शतकाचीही नोंद केली आहे. मात्र बीसीसीआयच्या निवड समितीने केलेल्या प्रोटोकॉलनुसार कार्तिकने यष्टीरक्षक म्हणून कामगिरी केली तरच त्याचा संघासाठी विचार होऊ शकतो. हाताला झालेल्या दुखापतीमुळे कार्तिक फक्त फलंदाज म्हणून संघात असल्याचे तामिळनाडू संघातील सुत्रांकडून सांगण्यात आले.