अ‍ॅपशहर

पंच लाँग यांना अभय

शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीशी नोबॉलवरून उडालेल्या खटक्यानंतर आपल्या खोलीच्या दरवाजाचे नुकसान करणारे पंच निजेल लाँग यांना आपल्या कृत्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल, मात्र त्यांना आयपीएल अंतिम सामन्यात पंच म्हणून हटविण्यात येणार नाही.

MT 8 May 2019, 7:39 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nigel-llong


शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीशी नोबॉलवरून उडालेल्या खटक्यानंतर आपल्या खोलीच्या दरवाजाचे नुकसान करणारे पंच निजेल लाँग यांना आपल्या कृत्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल, मात्र त्यांना आयपीएल अंतिम सामन्यात पंच म्हणून हटविण्यात येणार नाही.

बेंगळुरू आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात नोबॉल दिल्यावरून बेंगळुरू कर्णधार विराट कोहली आणि लाँग यांच्यात वाद झाला. त्यानंतर सामन्याच्या मध्यंतरात पंचांसाठी असलेल्या खोलीच्या दरवाजावर लाथ मारून लाँग यांनी आपला राग व्यक्त केला होता. त्यात दरवाजाचे नुकसान झाले होते.

यासंदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाँग यांना या घटनेबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागू शकते, पण हैदराबाद येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यावर जी पंच म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ती काढून घेण्यात येणार नाही. त्या क्षणी जी प्रतिक्रिया लाँग यांनी व्यक्त केली त्यावर टोकाची भूमिका घेण्याची गरज बीसीसीआयला वाटत नाही.

बेंगळुरूत झालेल्या या घटनेनंतर कर्नाटक राज्य संघटनेचे आर. सुधाकर राव यांनी लाँग यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पण लाँग यांनी नुकसानभरपाई दिली होती. राव यांनी सांगितले की, बीसीसीआयच्या प्रशासकांकडे या घटनेची माहिती देण्यात आली आहे. जर खेळाडूंवर गैरवर्तनाबद्दल कारवाई होते तर पंचांवर का नाही?

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशी लाँग यांचा वाद झाला आणि नंतर त्यांनी ५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले. पण त्याची पावतीही मागितली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज