चंडीगड : केंद्र सरकारकडे कागदपत्रे पाठविताना पंजाब सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने विलंब केल्यामुळे, माजी कसोटीपटू हरभजनसिंगला प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्कार मिळाला नाही, असे समोर आले आहे. त्यामुळे, पंजाब सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कसोटीमध्ये सर्वांत बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनसिंग तिसऱ्या क्रमांकावर असून, खेलरत्नसाठी त्याचे नामांकन रद्द झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, त्याची कागदपत्रे मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्याला हा पुरस्कार नाकारण्यात आल्याचा खुलासा केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमितसिंग सोधी यांनी सांगितले. आपण वेळेवरच कागदपत्रे सादर केली होती. मात्र, प्रशासनाकडून त्याला विलंब झाला आहे. प्रशासनाच्या अशा कारभारामुळे खेळाडूंना फटका बसत आहे, असे हरभजनसिंगने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
कागदपत्रांच्या विलंबामुळे हरभजनचा अर्ज नाकारला
केंद्र सरकारकडे कागदपत्रे पाठविताना पंजाब सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने विलंब केल्यामुळे, माजी कसोटीपटू हरभजनसिंगला प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्कार मिळाला नाही, असे समोर आले आहे. त्यामुळे, पंजाब सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स 1 Aug 2019, 4:00 am