अ‍ॅपशहर

R. Ashwin: अश्विनने चूक स्वीकारली!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने क्षेत्ररक्षणाचे नियम न पाळल्याबद्दल पंचांनी १७ व्या षटकात दिलेल्या 'नोबॉल'ची जबाबदारी पंजाबचा कर्णधार रवीचंद्रन अश्विनने स्वीकारली आहे.

MT 29 Mar 2019, 4:47 am
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने क्षेत्ररक्षणाचे नियम न पाळल्याबद्दल पंचांनी १७ व्या षटकात दिलेल्या 'नोबॉल'ची जबाबदारी पंजाबचा कर्णधार रवीचंद्रन अश्विनने स्वीकारली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ashwin


अश्विनच्या चुकीमुळे पंजाबला सामना गमवावा लागल्याची टीका क्रिकेटप्रेमींकडून होत आहे. या सामन्यामध्ये कोलकात्याच्या डावातील सतराव्या षटकात मोहम्मद शमीने अखेरच्या चेंडूवर आंद्रे रसेलचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. त्यावेळी रसेल अवघ्या ३ धावांवर खेळत होता. तथापि, पंजाबने ३० यार्ड क्षेत्ररक्षणाच्या वर्तुळात नियमानुसार अपेक्षिचत क्षेत्ररक्षकांपेक्षा एक क्षेत्ररक्षक कमी ठेवल्यामुळे पंचांनी हा चेंडू नोबॉल ठरवला. या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत रसेलने १७ चेंडूंमध्ये ३ चौकार व ५ षटकारांच्या जोरावर ४८ धावांची खेळी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज