नवी दिल्लीः हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल या दोन्ही खेळाडूंमध्ये खूप क्षमता आहे. त्यांनी आपल्या क्षमतेप्रमाणे खेळ करावा, असं मत भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अंडर १९ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यानं व्यक्त केलं आहे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने दोन्ही खेळाडूंना निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता दोघांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे. यावर द्रविडने आपले मत व्यक्त केले आहे.
पंड्या आणि राहुल या दोन्ही खेळाडूंत चांगली क्षमता आहे. मात्र, ते आपल्या क्षमतेनुसार खेळ करत नाहीत. आपल्या क्षमतेप्रमाणे त्यांनी खेळ केला, तर ते एक आदर्श प्रस्थापित करू शकतात, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला. या दोन्ही खेळाडूंचे निलंबन मागे घेण्यात आले, त्याबद्दल मला आनंद आहे. पण, या प्रकरणाची चौकशी सुदधा व्हायला हवी, असे राहुल द्रविडने स्पष्ट केले. दोघांनी आपापल्या चुका जरी मान्य केल्या असल्या, तरी सार्वजनिक स्तरावर मोठा त्रास सहन करावा लागला आहे. झालं गेलं विसरून जाऊन आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असं द्रविडनं सांगितलं.
राहुल आणि पंड्या या दोघांना मी प्रशिक्षण दिले आहे. कॉफी विथ करण या मुलाखतीचे व्हिडिओदेखील मी पाहिले आहेत. या मुलाखतीतून त्यांची खरी मतं समोर आली. यातून ते नक्कीच काहीतरी बोध घेतील, अशी मला आशा आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्रासारखं आहे. तुम्हाला यश मिळालं की, लोकं तुम्हाला डोक्यावर घेतील. मात्र, यासारख्या एखाद्या घटनेनंतर तुमचा तेवढाच तिरस्कारही करतील, असा सल्लाही राहुल द्रविडने यावेळी दिला आहे.
पंड्या आणि राहुल या दोन्ही खेळाडूंत चांगली क्षमता आहे. मात्र, ते आपल्या क्षमतेनुसार खेळ करत नाहीत. आपल्या क्षमतेप्रमाणे त्यांनी खेळ केला, तर ते एक आदर्श प्रस्थापित करू शकतात, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला. या दोन्ही खेळाडूंचे निलंबन मागे घेण्यात आले, त्याबद्दल मला आनंद आहे. पण, या प्रकरणाची चौकशी सुदधा व्हायला हवी, असे राहुल द्रविडने स्पष्ट केले. दोघांनी आपापल्या चुका जरी मान्य केल्या असल्या, तरी सार्वजनिक स्तरावर मोठा त्रास सहन करावा लागला आहे. झालं गेलं विसरून जाऊन आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असं द्रविडनं सांगितलं.
राहुल आणि पंड्या या दोघांना मी प्रशिक्षण दिले आहे. कॉफी विथ करण या मुलाखतीचे व्हिडिओदेखील मी पाहिले आहेत. या मुलाखतीतून त्यांची खरी मतं समोर आली. यातून ते नक्कीच काहीतरी बोध घेतील, अशी मला आशा आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्रासारखं आहे. तुम्हाला यश मिळालं की, लोकं तुम्हाला डोक्यावर घेतील. मात्र, यासारख्या एखाद्या घटनेनंतर तुमचा तेवढाच तिरस्कारही करतील, असा सल्लाही राहुल द्रविडने यावेळी दिला आहे.