कोलंबो : भारत-श्रीलंकादरम्यानच्या महिला संघातील दुसरी टी-२० क्रिकेट लढत पावसामुळे अनिर्णित राहिली. या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. अरुंधती रेड्डीने दुसऱ्याच षटकात यसोदा मेंडिसला बाद केले होते, तर चामरी अटापट्टूला दीप्ती शर्माने बाद केले होते. यानंतर पूनम यादवने दिल्हारीला माघारी पाठवले होते. या वेळी श्रीलंकेची ६.५ षटकांत ३ बाद ४४ अशी स्थिती होती. यानंतर ७.५ षटकांत श्रीलंकेच्या ३ बाद ४९ धावा झाल्या असताना पावसाला सुरुवात झाली. यानंतर मात्र खेळ होऊ शकला नाही. भारताने मालिकेतील पहिली लढत १३ धावांनी जिंकली आहे. तिसरी लढत शनिवारी होईल.
दुसऱ्या टी-२०लापावसाचा फटका
भारत-श्रीलंकादरम्यानच्या महिला संघातील दुसरी टी-२० क्रिकेट लढत पावसामुळे अनिर्णित राहिली...
Maharashtra Times 22 Sep 2018, 3:41 am