नवी दिल्ली : संस्कार हे रक्तातूनच येतात, असं म्हटलं जातं. अशीच एक गोष्ट युवा विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताची मान अभिमानाने उंचवणाऱ्या राज बावाच्याबाबतही घडले आहे. राजचे आजोबा हे महान हॉकीपटू होते आणि भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये तारलोचन बावा यांनी एक महत्वाचा गोल करत भारताला सुवर्णपदक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आता त्यांचा नातू राज बावाने क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे.
युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम फेरीत राजने इंग्लंडचे कंबरडे मोडले. राजने सुरुवातीला इंग्लंडच्या चार खेळाडूंना झटपट तंबूत धाडले, यापैकी दोन विकेट्स तर त्याने एकाच षटकात मिळवल्या. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला इंग्लंडची ६ बाद ६१ अशी अवस्था करता आली होती. तारलोचन हे राजचे आजोबा. १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर ४-० असा विजय मिळवला होता, त्यामध्ये एक महत्वाचा गोल हा तारलोचन यांचा होता. आपल्या आजोबांबद्दल बोलताना राज हा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
ऑलिम्पिकवीर आजोबांबाबत राज म्हणाला होता की, " जेव्हा मी आजोबांचे सुवर्णपदक पाहतो तेव्हा अंगावर रोमांच उभा राहतो. या गोष्टीचे मोल करू शकत नाही. त्याचबरोबर माझा बावा या कुटुंबात जन्म झाला, याचा मला अभिमान आहे. कारण आजोबांनी सुवर्णपदक जिंकलं होतं. बाबादेखील दमदार क्रिकेट खेळायचे आणि आता मीदेखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. आजोबांबरोबर मला जास्त काळ व्यतित करता आला नाही, कारण मी लहान असतानाच त्यांचे निधन झाले. पण त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील, अशाच आहेत. कारण माझ्या वडिलांनी त्यांच्या शौर्याच्या बऱ्याच कहाण्या मला सांगितल्या आहेत आणि त्या अजूनही माझ्या लक्षात आहेत. त्यामुळे या बावा कुटुंबात मी जन्म घेणं, हे मी माझं नशिब समजतो."
युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम फेरीत राजने इंग्लंडचे कंबरडे मोडले. राजने सुरुवातीला इंग्लंडच्या चार खेळाडूंना झटपट तंबूत धाडले, यापैकी दोन विकेट्स तर त्याने एकाच षटकात मिळवल्या. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला इंग्लंडची ६ बाद ६१ अशी अवस्था करता आली होती. तारलोचन हे राजचे आजोबा. १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर ४-० असा विजय मिळवला होता, त्यामध्ये एक महत्वाचा गोल हा तारलोचन यांचा होता. आपल्या आजोबांबद्दल बोलताना राज हा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.