मटा ऑनलाइन वृत्त | जयपूर
टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये फलंदाजांकडून गोलंदाजांची 'धुलाई' झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. पण जयपूरमधील एका सामन्यात युवा गोलंदाजानं आख्ख्या संघालाच गारद केलं आहे. ४ षटकांत धाव न देता १० गडी बाद करण्याचा विक्रम त्यानं आपल्या नावावर केला आहे.
जयपूरमध्ये टी-२० स्पर्धेत पर्ल अकादमी आणि दिशा अकादमी यांच्यात लढत झाली. पर्ल अकादमी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिशा अकादमीनं २० षटकांत १५६ धावा केल्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पर्ल अकादमी संघ अवघ्या ३६ धावांतच गारद झाला. दिशा अकादमीचा वेगवान गोलंदाज आकाश चौधरीनं टिच्चून मारा केला. आपल्या चार षटकांमध्ये त्यानं धाव न देता १० गडी बाद केले. पहिल्याच षटकात त्यानं पर्ल अकादमी संघाला दोन धक्के दिले. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात त्याने अनुक्रमे दोन बळी टिपले. तर अखेरच्या षटकात हॅट्ट्रिकसह चार फलंदाजांना तंबूत धाडले. आकाश मूळचा राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील आहे. त्याच्या या कामगिरीचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये फलंदाजांकडून गोलंदाजांची 'धुलाई' झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. पण जयपूरमधील एका सामन्यात युवा गोलंदाजानं आख्ख्या संघालाच गारद केलं आहे. ४ षटकांत धाव न देता १० गडी बाद करण्याचा विक्रम त्यानं आपल्या नावावर केला आहे.
जयपूरमध्ये टी-२० स्पर्धेत पर्ल अकादमी आणि दिशा अकादमी यांच्यात लढत झाली. पर्ल अकादमी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिशा अकादमीनं २० षटकांत १५६ धावा केल्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पर्ल अकादमी संघ अवघ्या ३६ धावांतच गारद झाला. दिशा अकादमीचा वेगवान गोलंदाज आकाश चौधरीनं टिच्चून मारा केला. आपल्या चार षटकांमध्ये त्यानं धाव न देता १० गडी बाद केले. पहिल्याच षटकात त्यानं पर्ल अकादमी संघाला दोन धक्के दिले. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात त्याने अनुक्रमे दोन बळी टिपले. तर अखेरच्या षटकात हॅट्ट्रिकसह चार फलंदाजांना तंबूत धाडले. आकाश मूळचा राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील आहे. त्याच्या या कामगिरीचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.