म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
सचिन तेंडुलकरसारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडविणारे गुरुवर्य रमाकांत आचरेकर हे ऋषितुल्य आहेत, त्यांनी केवळ क्रिकेटपटूच नव्हे तर माणसं घडविली अशा शब्दांत आचरेकर सरांचा गौरव त्यांच्या शिष्योत्तमांनी, सुहृदांनी आणि चाहत्यांनी एका संस्मरणीय कार्यक्रमात केला. गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे गुरुवंदनेचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भरगच्च सभागृहाच्या साक्षीने आचरेकर सरांना मानपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कसोटीपटू प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, समीर दिघे, बलविंदर संधू, किरण पोवार, नरेश चुरी आदि क्रिकेटपटूंसह पंच सुरेश शास्त्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आचरेकर सरांचे मित्र व त्यांचे समकालीन पांडुरंग साळगावकर, बापू गवाणकर यांनीही आठवणींना उजाळा दिला.
आचरेकर सरांवर चित्रपट
आतापर्यंत अनेक खेळाडूंवर चित्रपटाचे प्रयोग झाले, प्रशिक्षकांवर चित्रपट काढण्यात आलेले नाहीत. रमाकांत आचरेकर यांच्या संघर्षमय प्रवासावर एक चित्रपट येऊ घातला आहे. अमरजीत आमले यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे काम सुरू असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी प्रवीण अमरे म्हणाले की, मी ११ वर्षे सरांकडे खेळलो. खेळायचे ते जिंकण्यासाठीच ही प्रेरणा सरांनी दिली. नेहमी जगात अव्वल राहायचे हा संदेश त्यांनी बिंबवला. त्यांनी जी शिकवण दिली त्यातील १० टक्के तरी आम्हाला नवोदितांना देता आली तरी खूप कार्य केले असे म्हणता येईल.
नरेश चुरी : मी नेहमी विविध सामने पाहण्यासाठी सरांसोबत असायचो. माझ्यातून एक चांगला क्रिकेटपटू तयार व्हावा म्हणून सरांनी मलाच दत्तक घेतले. सुनील गावस्कर आणि अशोक मंकड यांच्यातील सर्वोत्तम बचाव कुणाचा हेदेखील त्यांनी मला समजावून सांगितले.
चंदू पंडित म्हणाले की, मला टेनिसबॉलने खेळताना सरांनी पाहिलं होतं. तेव्हा माझ्यात काहीतरी गुणवत्ता आहे, असं त्यांना वाटू लागलं. रॉबर्ट मनी शाळेतून काढून शारदाश्रममध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला पण माझ्या वडिलांना ते पटलं नाही. मग सर एकेदिवशी मध्यरात्री घरी आले आणि आमच्यासह एकत्र बसून त्यांनी वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. वडिलांना माझ्या नोकरीची चिंता होती. तेव्हा दरमहिन्याला १००० रु. देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी वडिलांचे मन वळविले. पंडित म्हणाले की, मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांच्यासाठी काय केले ? मुंबईने त्यांना काय दिले ?
बलविंदर संधू म्हणाले की, सरांनी मला कधी कर्णधार बनू दिलं नाही. कारण मी ऑफस्पिन गोलंदाजी करायचो. ती मी सुरू ठेवेन अशी भीती सरांना होती. खरे तर माझ्यात स्विंग गोलंदाजीची क्षमता आहे हे सरांनी अचूक ओळखलं होतं. पण एका सामन्यात मी ऑफस्पिन गोलंदाजीची हौस भागवून घेतली. सरांना मी करत असलेल्या मेहनतीवर विश्वास होता आणि मी खेळाचे निरीक्षण करून त्यातून शिकत जाईन, अशीही त्यांना खात्री होती.
पांडुरंग साळगावकर यांनी आचरेकर हे ऋषितुल्य आहेत, अशी टिप्पणी करून सर्वांच्या टाळ्या मिळविल्या.
यावेळी विजय शिरोडकर (मॅनेजर), वसंत पारकर यांचाही गौरव करण्यात आला.
सचिन तेंडुलकरसारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडविणारे गुरुवर्य रमाकांत आचरेकर हे ऋषितुल्य आहेत, त्यांनी केवळ क्रिकेटपटूच नव्हे तर माणसं घडविली अशा शब्दांत आचरेकर सरांचा गौरव त्यांच्या शिष्योत्तमांनी, सुहृदांनी आणि चाहत्यांनी एका संस्मरणीय कार्यक्रमात केला. गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे गुरुवंदनेचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भरगच्च सभागृहाच्या साक्षीने आचरेकर सरांना मानपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कसोटीपटू प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, समीर दिघे, बलविंदर संधू, किरण पोवार, नरेश चुरी आदि क्रिकेटपटूंसह पंच सुरेश शास्त्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आचरेकर सरांचे मित्र व त्यांचे समकालीन पांडुरंग साळगावकर, बापू गवाणकर यांनीही आठवणींना उजाळा दिला.
आचरेकर सरांवर चित्रपट
आतापर्यंत अनेक खेळाडूंवर चित्रपटाचे प्रयोग झाले, प्रशिक्षकांवर चित्रपट काढण्यात आलेले नाहीत. रमाकांत आचरेकर यांच्या संघर्षमय प्रवासावर एक चित्रपट येऊ घातला आहे. अमरजीत आमले यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे काम सुरू असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी प्रवीण अमरे म्हणाले की, मी ११ वर्षे सरांकडे खेळलो. खेळायचे ते जिंकण्यासाठीच ही प्रेरणा सरांनी दिली. नेहमी जगात अव्वल राहायचे हा संदेश त्यांनी बिंबवला. त्यांनी जी शिकवण दिली त्यातील १० टक्के तरी आम्हाला नवोदितांना देता आली तरी खूप कार्य केले असे म्हणता येईल.
नरेश चुरी : मी नेहमी विविध सामने पाहण्यासाठी सरांसोबत असायचो. माझ्यातून एक चांगला क्रिकेटपटू तयार व्हावा म्हणून सरांनी मलाच दत्तक घेतले. सुनील गावस्कर आणि अशोक मंकड यांच्यातील सर्वोत्तम बचाव कुणाचा हेदेखील त्यांनी मला समजावून सांगितले.
चंदू पंडित म्हणाले की, मला टेनिसबॉलने खेळताना सरांनी पाहिलं होतं. तेव्हा माझ्यात काहीतरी गुणवत्ता आहे, असं त्यांना वाटू लागलं. रॉबर्ट मनी शाळेतून काढून शारदाश्रममध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला पण माझ्या वडिलांना ते पटलं नाही. मग सर एकेदिवशी मध्यरात्री घरी आले आणि आमच्यासह एकत्र बसून त्यांनी वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. वडिलांना माझ्या नोकरीची चिंता होती. तेव्हा दरमहिन्याला १००० रु. देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी वडिलांचे मन वळविले. पंडित म्हणाले की, मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांच्यासाठी काय केले ? मुंबईने त्यांना काय दिले ?
बलविंदर संधू म्हणाले की, सरांनी मला कधी कर्णधार बनू दिलं नाही. कारण मी ऑफस्पिन गोलंदाजी करायचो. ती मी सुरू ठेवेन अशी भीती सरांना होती. खरे तर माझ्यात स्विंग गोलंदाजीची क्षमता आहे हे सरांनी अचूक ओळखलं होतं. पण एका सामन्यात मी ऑफस्पिन गोलंदाजीची हौस भागवून घेतली. सरांना मी करत असलेल्या मेहनतीवर विश्वास होता आणि मी खेळाचे निरीक्षण करून त्यातून शिकत जाईन, अशीही त्यांना खात्री होती.
पांडुरंग साळगावकर यांनी आचरेकर हे ऋषितुल्य आहेत, अशी टिप्पणी करून सर्वांच्या टाळ्या मिळविल्या.
यावेळी विजय शिरोडकर (मॅनेजर), वसंत पारकर यांचाही गौरव करण्यात आला.