मटा ऑनलाइन वृत्त । वडोदरा
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेला भारतीय संघाचा पराभव सगळ्यांच्याच जिव्हारी लागलेला असताना आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या धक्कादायक पराभवाची चौकशी करण्याची मागणी करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज मात केली होती. असे असताना तगडा भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाक संघाकडून पराभूत कसा होऊ शकतो?, असा प्रश्न आठवले यांनी उपस्थित केला आहे.
वडोदरा येथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर आठवले यांना पत्रकारांनी भारत-पाक सामन्याबाबत विचारले असता त्यांनी या सामन्याच्या चौकशीची मागणी केली.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कसोटीपटू आमिर सोहलनेही पाकिस्तानचा संघ फिक्सींग करून अंतिम फेरीत पोहोचल्याचा आरोप केला होता. कर्णधार सरफराज अहमद याच्यावरही त्याने आरोप केला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेला भारतीय संघाचा पराभव सगळ्यांच्याच जिव्हारी लागलेला असताना आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या धक्कादायक पराभवाची चौकशी करण्याची मागणी करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज मात केली होती. असे असताना तगडा भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाक संघाकडून पराभूत कसा होऊ शकतो?, असा प्रश्न आठवले यांनी उपस्थित केला आहे.
वडोदरा येथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर आठवले यांना पत्रकारांनी भारत-पाक सामन्याबाबत विचारले असता त्यांनी या सामन्याच्या चौकशीची मागणी केली.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कसोटीपटू आमिर सोहलनेही पाकिस्तानचा संघ फिक्सींग करून अंतिम फेरीत पोहोचल्याचा आरोप केला होता. कर्णधार सरफराज अहमद याच्यावरही त्याने आरोप केला होता.