अ‍ॅपशहर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या नेतृत्वाचा मुंबईकडे अभाव !

एकीकडे अन्य संघांची सुधारलेली कामगिरी हे मुंबईच्या सध्याच्या डळमळीत कामगिरीला कारणीभूत आहे, असे मत मांडतानाच भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकरला सध्याच्या मुंबई संघात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची उणीव जाणवत असल्याचेही वाटते.

Maharashtra Times 24 Nov 2017, 4:00 am
एकीकडे अन्य संघांची सुधारलेली कामगिरी हे मुंबईच्या सध्याच्या डळमळीत कामगिरीला कारणीभूत आहे, असे मत मांडतानाच भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकरला सध्याच्या मुंबई संघात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची उणीव जाणवत असल्याचेही वाटते. जर आपण मुंबईच्या याआधीच्या जबरदस्त कामगिरीकडे नजर टाकली तरी त्या संघांत एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संघाचे नेतृत्व करत असे. मी स्वतः संदीप पाटीलच्या नेतृत्वाखाली मुंबई संघातून खेळलो. त्यामुळे वरच्या स्तरातून योग्य संदेश मिळतील याची खबरदारी तो घेत असे. पण आता हे वातावरण काहीसे हरवले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ranjiother teams getting stronger than says manjrekar
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या नेतृत्वाचा मुंबईकडे अभाव !


मुंबईचा माजी कर्णधार आणि भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकर याला वाटते की, ‘अन्य संघांची सुधारलेली कामगिरी ही मुंबईच्या घसरत्या कामगिरीला कारणीभूत आहे.’

आताच्या रणजी हंगामात क गटात खेळत असलेल्या मुंबईला अद्याप बाद फेरीत स्थान मिळेल की नाही, याविषयी शंका आहे. त्रिपुराविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

मुंबई आणि त्रिपुरा यांच्यातील अखेरची साखळी लढत २५ नोव्हेंबरपासून वानखेडेवर रंगणार आहे. गेल्या वर्षी अंतिम फेरीत मुंबईवर गुजरातने मात करत रणजी करंडक पटकाविला होता.

मांजरेकर म्हणतो की, ‘आता अन्य शहरातील मुलेही त्याच उत्साहाने, जिद्दीने खेळू लागली आहेत. प्रारंभी, मुंबई आणि काही महत्त्वाची शहरे ही वर्चस्व गाजवत असत पण आता अन्य संघही बळकट होऊ लागले आहेत. देशभरात असे अनेक खेळाडू आहेत, जे स्पर्धेत उतरले आहेत.’

एका पुस्तक प्रकाशनात संजय मांजरेकर आणि भारताचा माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांनी मुंबई क्रिकेटबद्दल मनमोकळी मते व्यक्त केली. राजपूत म्हणाले की, अन्य राज्यातील खेळाडूही आता चांगला खेळ करू लागले आहेत. त्याशिवाय, आयपीएलचा प्रभावही महत्त्वाचा आहे. या लीगमुळे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. राजपूत यांनी एक उदाहरण दिले की, पूर्वी गुजरातला आपण दोन दिवसांत गारद करू असा विश्वास व्यक्त केला जात असे. आज अन्य संघ मुंबईला आपण हरवू शकतो, असा विश्वास व्यक्त करू लागले आहेत. बलाढ्य संघांना आपण पराभूत करू शकतो, असा आत्मविश्वास अन्य राज्यांच्या खेळाडूंमध्ये येऊ लागला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज