अ‍ॅपशहर

शास्त्री करणार प्रशिक्षकपदासाठी अर्ज

भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद रिक्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत ९ जुलैपर्यंत वाढवली आहे.

Maharashtra Times 28 Jun 2017, 4:00 am
शास्त्री करणार प्रशिक्षकपदासाठी अर्ज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravi shastri apply for coach post
शास्त्री करणार प्रशिक्षकपदासाठी अर्ज


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद रिक्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत ९ जुलैपर्यंत वाढवली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय रवी शास्त्री हे प्रशिक्षकपदासाठी इच्छूक असून, ते लवकरच या पदासाठी अर्ज करणार आहेत. माजी अष्टपैलू रवी शास्त्री हे ऑगस्ट २०१४ ते जून २०१६पर्यंत भारतीय संघाचे संचालक होते. त्यांचे कर्णधार विराट कोहलीसह चांगले सूत जमले होते. कोहलीशी झालेल्या मतभेदांमुळे अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिला. या साऱ्या प्रकरणांत कोहलीने प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींच्या नावाची शिफारस केल्याचेही वृत्त होते. शास्त्री हे प्रशिक्षकपदी विराजमान झाले, तर सहायक वर्गातही त्यांचे निकटवर्तीय दिसतील, अशी चर्चा आहे. गोलंदाज प्रशिक्षक भारत अरुण हे त्यापैकी एक आहे.

शास्त्री हे भारतीय संघाचे संचालक असताना भारताने इंग्लंडमधील इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका ३-१ अशी जिंकली होती. त्याचबरोबर २०१५च्या वनडे वर्ल्डकपमध्ये आणि २०१६च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली होती. श्रीलंका, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिकाही भारताने यादरम्यान जिंकली होती. मात्र, शास्त्री आणि भारताचा माजी कर्णधार; तसेच क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य सौरभ गांगुली यांचे संबंध फारसे चांगले नाहीत. स्काइपवरून शास्त्रींनी मुलाखत दिली होती, तेव्हा गांगुली उपस्थित नव्हता. शास्त्रींना पुन्हा प्रशिक्षकपदासाठी सचिन तेंडुलकर, गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या समितीला सामोरे जावे लागेल. अर्थात, नवीन प्रशिक्षकांसोबतचा करार हा दोन वर्षांसाठी असू शकतो. कारण २०१९चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून संघ बांधणी करावी लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज