सचिन तेंडुलकरनेही गावस्कर यांच्या सुरात मिसळला सूर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानशी जर खेळण्याचे भारताने नाकारले तर भारताला दोन गुण गमवावे लागतील आणि याचा फायदा पाकिस्तानलाच होईल, असे मत भारताचा मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. गुरुवारी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले होते की, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानशी न खेळण्याचा अट्टहास धरू नये. कारण त्यात नुकसान भारताचेच होईल.
सचिनने म्हटले आहे की, भारताने नेहमीच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर मात केली आहे. त्यांना पुन्हा एकदा पराभूत करण्याची संधी आपल्याला आहे. त्यांच्याशी न खेळून त्यांना दोन गुण स्वस्तात बहाल करण्याची माझी तयारी नाही. अर्थात, भारताच्या हिताला माझे प्रथम प्राधान्य असेल. त्यामुळे देशाची जी काही भूमिका यासंदर्भात असेल त्याला माझा पाठिंबा असेल.
क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर पूर्ण बहिष्कार टाकावा, असे विधान हरभजनसिंग आणि भारताचा फिरकी गोलंदाज यजुर्वेंद्र चहलने केले होते. त्यावरून विविध मतमतांतरे व्यक्त होत होती.
गावस्कर म्हणाले होते की, जर आपण पाकिस्तानशी खेळायचे नाही असे ठरवले तर कोण जिंकेल? मी उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीचेही बोलत नाही. पण जर आपण खेळलो नाही तर पाकिस्तानला दोन गुण सहज मिळतील. आपण आतापर्यंत पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे एका अर्थाने आपण दोन गुण गमावणार आहोत. त्यापेक्षा पाकिस्तानला या दोन गुणांसह पुढे जाण्याची संधी द्यायची नाही, याचा विचार करायला हवा.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानशी जर खेळण्याचे भारताने नाकारले तर भारताला दोन गुण गमवावे लागतील आणि याचा फायदा पाकिस्तानलाच होईल, असे मत भारताचा मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. गुरुवारी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले होते की, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानशी न खेळण्याचा अट्टहास धरू नये. कारण त्यात नुकसान भारताचेच होईल.
सचिनने म्हटले आहे की, भारताने नेहमीच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर मात केली आहे. त्यांना पुन्हा एकदा पराभूत करण्याची संधी आपल्याला आहे. त्यांच्याशी न खेळून त्यांना दोन गुण स्वस्तात बहाल करण्याची माझी तयारी नाही. अर्थात, भारताच्या हिताला माझे प्रथम प्राधान्य असेल. त्यामुळे देशाची जी काही भूमिका यासंदर्भात असेल त्याला माझा पाठिंबा असेल.
क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर पूर्ण बहिष्कार टाकावा, असे विधान हरभजनसिंग आणि भारताचा फिरकी गोलंदाज यजुर्वेंद्र चहलने केले होते. त्यावरून विविध मतमतांतरे व्यक्त होत होती.
गावस्कर म्हणाले होते की, जर आपण पाकिस्तानशी खेळायचे नाही असे ठरवले तर कोण जिंकेल? मी उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीचेही बोलत नाही. पण जर आपण खेळलो नाही तर पाकिस्तानला दोन गुण सहज मिळतील. आपण आतापर्यंत पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे एका अर्थाने आपण दोन गुण गमावणार आहोत. त्यापेक्षा पाकिस्तानला या दोन गुणांसह पुढे जाण्याची संधी द्यायची नाही, याचा विचार करायला हवा.