म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
शार्दुलची भारतीय संघात निवड झाली याचा खूप आनंद आहे. गेली दोन वर्षे तो सातत्यपूर्ण कामगिरी करत होता आणि त्याचे फळ त्याला मिळाले. त्याला नेहमीच माझे सांगणे होते की, तू विकेट मिळविण्यासाठी खेळू नकोस. विकेटस तुला मिळतीलच. पण तुझ्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेव, चेंडूची दिशा-टप्पा याकडे लक्ष दे. शेवटी निवड समितीचे सदस्य हे तू काढलेल्या विकेटसबरोबरच तुझे गोलंदाजीवर कसे नियंत्रण आहे हे प्रामुख्याने पाहतात. एक मात्र खरे की, ही कामगिरी करत असताना संधी मिळत नाही असे निराशाजनक उदगार त्याने कधीही काढले नाहीत. जिद्दीने गोलंदाजी करत राहायची हा ध्यास त्याने बाळगला. रणजीत सौराष्ट्रविरुद्ध त्याने केलेली गोलंदाजी अप्रतिम होती, तो स्पेल मला अजूनही लक्षात आहे. आता शार्दुलला भारतीय संघाचा दरवाजा उघडला आहे. त्याने तो आतून बंद करून घ्यावा आणि आता मी या दरवाजातून बाहेर पडणार नाही, असा निश्चय करावा.
-चंद्रकांत पंडित, मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक
रणजीतून कसोटीची योग्य संधी
शार्दुलची निवड झाली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबईने मिळविलेल्या रणजी विजेतेपदात शार्दुलचा मोठा वाटा आहे. मी प्रशिक्षक असताना त्याने पाचवेळा पाच विकेटस घेण्याचा पराक्रम केला होता आणि हंगामातील सर्वाधिक बळी त्याच्या नावावर होते. फिटनेसच महत्त्व त्याला त्यावेळी कळलं आणि त्याने त्यावर मेहनत घेतली. रणजीत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याला कसोटीत संधी मिळाली आहे हे अधिक योग्य झालं. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची खरी कसोटी लागेल. मी प्रशिक्षक असताना मुंबई जम्मू-काश्मीरकडून आणि नंतर रेल्वेकडून हरली होती. तेव्हाच त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध ६ विकेटस आणि ८० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करून मुंबईला विजय मिळवून दिला होता. हा त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइट होता. त्याला शुभेच्छा.
-प्रवीण अमरे, माजी कसोटीपटू
स्वप्न पूर्ण केलं
शार्दुलने आज त्याचं आणि माझं स्वप्न पूर्ण केलंय. नववीत असताना पालघरमध्ये खेळत असलेल्या शार्दुलला स्वामी विवेकानंद शाळेत खेळायला आणलं. त्याची माझ्या घरी राहण्याची व्यवस्था केली. मुंबईत खेळला तरच त्याच्या कारकीर्दीला आकार देता येईल हे मी त्याच्या वडिलांना सांगितलं आणि त्यांनीही परवानगी दिली. त्याच्याकडून ज्या अपेक्षा मला वाटत होत्या त्या त्याने पूर्ण केल्या आहेत. आता त्याने मानसिकदृष्ट्या कणखर राहावं आणि भारतासाठी अनेक वर्ष खेळावं हीच इच्छा.
-दिनेश लाड, शार्दुलचे प्रशिक्षक
शार्दुलची भारतीय संघात निवड झाली याचा खूप आनंद आहे. गेली दोन वर्षे तो सातत्यपूर्ण कामगिरी करत होता आणि त्याचे फळ त्याला मिळाले. त्याला नेहमीच माझे सांगणे होते की, तू विकेट मिळविण्यासाठी खेळू नकोस. विकेटस तुला मिळतीलच. पण तुझ्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेव, चेंडूची दिशा-टप्पा याकडे लक्ष दे. शेवटी निवड समितीचे सदस्य हे तू काढलेल्या विकेटसबरोबरच तुझे गोलंदाजीवर कसे नियंत्रण आहे हे प्रामुख्याने पाहतात. एक मात्र खरे की, ही कामगिरी करत असताना संधी मिळत नाही असे निराशाजनक उदगार त्याने कधीही काढले नाहीत. जिद्दीने गोलंदाजी करत राहायची हा ध्यास त्याने बाळगला. रणजीत सौराष्ट्रविरुद्ध त्याने केलेली गोलंदाजी अप्रतिम होती, तो स्पेल मला अजूनही लक्षात आहे. आता शार्दुलला भारतीय संघाचा दरवाजा उघडला आहे. त्याने तो आतून बंद करून घ्यावा आणि आता मी या दरवाजातून बाहेर पडणार नाही, असा निश्चय करावा.
-चंद्रकांत पंडित, मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक
रणजीतून कसोटीची योग्य संधी
शार्दुलची निवड झाली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबईने मिळविलेल्या रणजी विजेतेपदात शार्दुलचा मोठा वाटा आहे. मी प्रशिक्षक असताना त्याने पाचवेळा पाच विकेटस घेण्याचा पराक्रम केला होता आणि हंगामातील सर्वाधिक बळी त्याच्या नावावर होते. फिटनेसच महत्त्व त्याला त्यावेळी कळलं आणि त्याने त्यावर मेहनत घेतली. रणजीत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याला कसोटीत संधी मिळाली आहे हे अधिक योग्य झालं. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची खरी कसोटी लागेल. मी प्रशिक्षक असताना मुंबई जम्मू-काश्मीरकडून आणि नंतर रेल्वेकडून हरली होती. तेव्हाच त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध ६ विकेटस आणि ८० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करून मुंबईला विजय मिळवून दिला होता. हा त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइट होता. त्याला शुभेच्छा.
-प्रवीण अमरे, माजी कसोटीपटू
स्वप्न पूर्ण केलं
शार्दुलने आज त्याचं आणि माझं स्वप्न पूर्ण केलंय. नववीत असताना पालघरमध्ये खेळत असलेल्या शार्दुलला स्वामी विवेकानंद शाळेत खेळायला आणलं. त्याची माझ्या घरी राहण्याची व्यवस्था केली. मुंबईत खेळला तरच त्याच्या कारकीर्दीला आकार देता येईल हे मी त्याच्या वडिलांना सांगितलं आणि त्यांनीही परवानगी दिली. त्याच्याकडून ज्या अपेक्षा मला वाटत होत्या त्या त्याने पूर्ण केल्या आहेत. आता त्याने मानसिकदृष्ट्या कणखर राहावं आणि भारतासाठी अनेक वर्ष खेळावं हीच इच्छा.
-दिनेश लाड, शार्दुलचे प्रशिक्षक