केपटाऊन :
भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीतून सावरला असून तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळणार असल्याचे दिलासादायक वृत्त हाती येत असताना, दुसरीकडे मात्र टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा या कसोटीत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. जाडेजाला ताप आल्याने त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीसीसीआयने एका पत्रकाद्वारे या दोन्ही खेळाडूंच्या तब्येतीची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी शिखर धवनच्या घोट्याला दुखापत झाली होती,परंतु आता तो पूर्णपणे फिट असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जाडेजा गेल्या काही दिवसांपासून तापाने फणफणला असून बीसीसीआयची मेडिकल टीम आणि केपटाऊनमधील स्थानिक मेडिकल टीम त्याची देखरेख करत असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
मेडिकल टीमने जाडेजाला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला असून ४८ तासात त्याच्या प्रकृतीत किती सुधारणा होते हे पाहिले जाणार आहे. त्यानुसार, तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याचा निर्णय सामना सुरु होण्याच्या दिवशी सकाळी घेतला जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार असून पहिला सामना शुक्रवारी सुरू होणार आहे.
भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीतून सावरला असून तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळणार असल्याचे दिलासादायक वृत्त हाती येत असताना, दुसरीकडे मात्र टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा या कसोटीत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. जाडेजाला ताप आल्याने त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीसीसीआयने एका पत्रकाद्वारे या दोन्ही खेळाडूंच्या तब्येतीची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी शिखर धवनच्या घोट्याला दुखापत झाली होती,परंतु आता तो पूर्णपणे फिट असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जाडेजा गेल्या काही दिवसांपासून तापाने फणफणला असून बीसीसीआयची मेडिकल टीम आणि केपटाऊनमधील स्थानिक मेडिकल टीम त्याची देखरेख करत असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
मेडिकल टीमने जाडेजाला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला असून ४८ तासात त्याच्या प्रकृतीत किती सुधारणा होते हे पाहिले जाणार आहे. त्यानुसार, तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याचा निर्णय सामना सुरु होण्याच्या दिवशी सकाळी घेतला जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार असून पहिला सामना शुक्रवारी सुरू होणार आहे.