मेलबर्न
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या संघात असणे हे संघाच्या समतोलासाठी आवश्यक आहे, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आज व्यक्त केलेय. करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर बीसीसीआयने त्याला संघाबाहेर बसवले आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना उद्या शुक्रवारी खेळवला जाणार आहे.
उद्या होणाऱ्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना धवन म्हणाला, संघाच्या समतोलासाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघात असणे गरजेचे आहे. तो असल्यानंतर संघात जो समतोल असतो तो आवश्यक आहे. अहमद आणि सिराज यांच्या गोलंदाजीबद्दल कोणतीही चिंता नाही. ते आता नवीन आहेत त्यामुळे त्यांना सांभाळून घ्यायला हवे. काही चुकांमधून ते परिपूर्ण होतील. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ वनडे मालिकाही जिंकून इतिहास रचेल, असे धवन म्हणाला. मालिका जिंकणे जितके म्हत्त्वाचे आहे तितकेच कसोटी व वनडे सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. आम्ही मागच्या सामन्यात चांगला खेळ केला. महेंद्र सिंह धोनीचा खेळही चांगला राहिला, असे धवन म्हणाला.
ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची कमतरता जाणवतेय. तर भारताला भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी यांच्या अनुभवाचा फायदा मिळत असल्याचेही धवन म्हणाला.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या संघात असणे हे संघाच्या समतोलासाठी आवश्यक आहे, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आज व्यक्त केलेय. करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर बीसीसीआयने त्याला संघाबाहेर बसवले आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना उद्या शुक्रवारी खेळवला जाणार आहे.
उद्या होणाऱ्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना धवन म्हणाला, संघाच्या समतोलासाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघात असणे गरजेचे आहे. तो असल्यानंतर संघात जो समतोल असतो तो आवश्यक आहे. अहमद आणि सिराज यांच्या गोलंदाजीबद्दल कोणतीही चिंता नाही. ते आता नवीन आहेत त्यामुळे त्यांना सांभाळून घ्यायला हवे. काही चुकांमधून ते परिपूर्ण होतील. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ वनडे मालिकाही जिंकून इतिहास रचेल, असे धवन म्हणाला. मालिका जिंकणे जितके म्हत्त्वाचे आहे तितकेच कसोटी व वनडे सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. आम्ही मागच्या सामन्यात चांगला खेळ केला. महेंद्र सिंह धोनीचा खेळही चांगला राहिला, असे धवन म्हणाला.
ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची कमतरता जाणवतेय. तर भारताला भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी यांच्या अनुभवाचा फायदा मिळत असल्याचेही धवन म्हणाला.