व्हीव्हीएस लक्ष्मण
सनरायझर्स हैदराबादला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला आणि आमचे आयपीएलमधील आव्हान अखेर संपुष्टात आले. आमच्या आयपीएलमधील मोहिमेत आम्ही सर्वोत्तम नव्हतो. तरीही आमचा संघर्ष सुरू होता. अखेरीस आमचे प्रयत्न तोकडे पडले. मात्र या मोहिमेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.
विशाखापट्टणममध्ये यापूर्वी खेळलेलो असल्यामुळे इथल्या वातावरणाची आम्हाला पुरेशी कल्पना होती. वृद्धिमान साहाला झटपट गमावल्यानंतर मार्टिन गप्टिलने आम्हाला आधार दिला. तरीही मधल्या काळात फिरकी गोलंदाजीचा सामना करताना आमची दमछाक झाली. खरे तर आमच्या ताफ्यात फिरकी गोलंदाजीचा उत्तम सामना करू शकतील असे खेळाडू आहेत. पण या सामन्यात मात्र ते कौशल्य कमी पडले. आम्हाला १०-१५ धावा कमी पडल्या.
दिल्ली आमच्या धावसंख्येला तेवढेच चोख प्रत्युत्तर देईल हे आम्हाला ठाऊक होते. शिखर धवनला सूर गवसत नव्हता पण पृथ्वी सावने जबरदस्त खेळ केला. त्याचा झेल सुटल्यानंतरही त्याने धोका पत्करून खेळ केला. तरीही आम्ही अखेरच्या चार षटकात ४२ धावा काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे ठेवले. ऋषभ पंतसारख्या धोकादायक खेळाडूचे आव्हान मात्र होतेच. तो गोलंदाजांवर तुटून पडला. तो भारतीय क्रिकेटचे भवितव्य आहे हे त्याने दाखवून दिले. मात्र त्याला सामन्याच्या अखेरपर्यंत काही टिकाव धरता आला नाही.
हैदराबाद संघाने आपली प्रतिष्ठा जपली असे मात्र मी म्हणेन. गेल्या तीन सामन्यांत आम्ही अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली तर एक सामना सुपर ओव्हरपर्यंत ताणला गेला. आता पुढील हंगामापर्यंत आम्हाला चांगली तयारी करावी लागेल. १३व्या हंगामात आम्हाला यश मिळेल अशी अपेक्षा आहे.
सनरायझर्स हैदराबादला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला आणि आमचे आयपीएलमधील आव्हान अखेर संपुष्टात आले. आमच्या आयपीएलमधील मोहिमेत आम्ही सर्वोत्तम नव्हतो. तरीही आमचा संघर्ष सुरू होता. अखेरीस आमचे प्रयत्न तोकडे पडले. मात्र या मोहिमेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.
विशाखापट्टणममध्ये यापूर्वी खेळलेलो असल्यामुळे इथल्या वातावरणाची आम्हाला पुरेशी कल्पना होती. वृद्धिमान साहाला झटपट गमावल्यानंतर मार्टिन गप्टिलने आम्हाला आधार दिला. तरीही मधल्या काळात फिरकी गोलंदाजीचा सामना करताना आमची दमछाक झाली. खरे तर आमच्या ताफ्यात फिरकी गोलंदाजीचा उत्तम सामना करू शकतील असे खेळाडू आहेत. पण या सामन्यात मात्र ते कौशल्य कमी पडले. आम्हाला १०-१५ धावा कमी पडल्या.
दिल्ली आमच्या धावसंख्येला तेवढेच चोख प्रत्युत्तर देईल हे आम्हाला ठाऊक होते. शिखर धवनला सूर गवसत नव्हता पण पृथ्वी सावने जबरदस्त खेळ केला. त्याचा झेल सुटल्यानंतरही त्याने धोका पत्करून खेळ केला. तरीही आम्ही अखेरच्या चार षटकात ४२ धावा काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे ठेवले. ऋषभ पंतसारख्या धोकादायक खेळाडूचे आव्हान मात्र होतेच. तो गोलंदाजांवर तुटून पडला. तो भारतीय क्रिकेटचे भवितव्य आहे हे त्याने दाखवून दिले. मात्र त्याला सामन्याच्या अखेरपर्यंत काही टिकाव धरता आला नाही.
हैदराबाद संघाने आपली प्रतिष्ठा जपली असे मात्र मी म्हणेन. गेल्या तीन सामन्यांत आम्ही अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली तर एक सामना सुपर ओव्हरपर्यंत ताणला गेला. आता पुढील हंगामापर्यंत आम्हाला चांगली तयारी करावी लागेल. १३व्या हंगामात आम्हाला यश मिळेल अशी अपेक्षा आहे.