नवी दिल्ली: दिल्लीच्या प्रदूषित हवेत खेळताना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार करणारे श्रीलंका संघाचे काही खेळाडू आज मैदानावर मास्क लावूनच उतरले. त्यामुळं पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली असतानाच लंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल मैदानात ओकला. लकमलची ही अवस्था दिल्लीतील प्रदूषित हवेमुळं झाली की त्याला आणखी काही कारण आहे, हे मात्र कळू शकलेलं नाही.
तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी भारताच्या ५३६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ३७३ धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरू झाला. त्यावेळी पाहुण्या संघातील सात खेळाडू मास्क घालून क्षेत्ररक्षणासाठी उतरले. कर्णधार दिनेश चंडीमल याच्यासह एन्जलो मॅथ्यूज, सदिरा समाराविक्रमा, धनंजय डीसिल्वा यांनी मास्क घातले होते. तर, यष्टीरक्षक निरोशन डिकवेला व लकमल यांनी मास्क घातले नव्हते. सहावं षटक सुरू असताना लकमलला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही कळण्याच्या आत तो मैदानावर ओकला. त्यानंतर त्यानं मैदान सोडलं. काही वेळानंतर तो पुन्हा मैदानात आला.
आमच्या खेळाडूंना उलट्या झाल्या : पोथास
दिनेश चंडीमल 'रडला', भारताने डाव सोडला!
लंकेचे ९ खेळाडू विमानतळावरूनच परतले!
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झालेल्या ९ खेळाडूंना श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानं विमानतळावरूनच परत बोलावलं आहे. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी त्यांना भारतात जाण्याची परवानगी नाकारल्याचं समजतं. हे सर्व खेळाडू आज सकाळी दहा वाजेपर्यंत दिल्लीत पोहोचणार होते. मात्र, त्यांना थांबवण्यात आलं आहे. प्रदूषण हेच कारण त्यामागे असल्याचं सांगितलं जातं.
तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी भारताच्या ५३६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ३७३ धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरू झाला. त्यावेळी पाहुण्या संघातील सात खेळाडू मास्क घालून क्षेत्ररक्षणासाठी उतरले. कर्णधार दिनेश चंडीमल याच्यासह एन्जलो मॅथ्यूज, सदिरा समाराविक्रमा, धनंजय डीसिल्वा यांनी मास्क घातले होते. तर, यष्टीरक्षक निरोशन डिकवेला व लकमल यांनी मास्क घातले नव्हते. सहावं षटक सुरू असताना लकमलला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही कळण्याच्या आत तो मैदानावर ओकला. त्यानंतर त्यानं मैदान सोडलं. काही वेळानंतर तो पुन्हा मैदानात आला.
आमच्या खेळाडूंना उलट्या झाल्या : पोथास
दिनेश चंडीमल 'रडला', भारताने डाव सोडला!
लंकेचे ९ खेळाडू विमानतळावरूनच परतले!
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झालेल्या ९ खेळाडूंना श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानं विमानतळावरूनच परत बोलावलं आहे. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी त्यांना भारतात जाण्याची परवानगी नाकारल्याचं समजतं. हे सर्व खेळाडू आज सकाळी दहा वाजेपर्यंत दिल्लीत पोहोचणार होते. मात्र, त्यांना थांबवण्यात आलं आहे. प्रदूषण हेच कारण त्यामागे असल्याचं सांगितलं जातं.