अ‍ॅपशहर

...तर भारत-श्रीलंका फायनलची चौकशी!

भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये झालेल्या अंतिम सामन्याची चौकशी करण्याची तयारी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयाश्री जयशेखर यांनी दाखवली आहे. या सामन्याबाबत कुणी लेखी तक्रार केल्यास चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे दयाश्री यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Maharashtra Times 19 Jul 2017, 10:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलंबो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sri lanka sports minister willing to probe 2011 world cup final
...तर भारत-श्रीलंका फायनलची चौकशी!


भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये झालेल्या अंतिम सामन्याची चौकशी करण्याची तयारी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयाश्री जयशेखर यांनी दाखवली आहे. या सामन्याबाबत कुणी लेखी तक्रार केल्यास चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे दयाश्री यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भारत-श्रीलंका अंतिम सामन्यावर श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि विद्यमान मंत्री अर्जुन रणतुंगाने काही दिवसांपूर्वीच संशय घेतला होता. मी या सामन्याच्या समालोचनासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होतो आणि श्रीलंकेच्या खेळाडूंचा एकूणच खेळ संशयास्पद होता, असे रणतुंगा म्हणाला होता. त्यानंतर माजी क्रीडा मंत्री महिंदानंदा अलुथगामगे यांनीही रणतुंगाच्या सुरात सूर मिसळला होता.

एका वरिष्ठ खेळाडूने सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ५०पेक्षा जास्त सागारेट ओढल्या आणि सामना संपल्यानंतर कर्णधारानेही कोणतंही कारण न देता राजीनामा देण्याची तयारी दर्शविली, असे संघ व्यवस्थापकांच्या अहवालात म्हटले होते. याप्रकरणी चौकशी व्हावी, असे तत्कालीन क्रिकेट व्यवस्थापन समितीने सांगितले होते, असे अलुथगामगे यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी क्रीडामंत्री दयाश्री यांना विचारले असता त्यांनी या सामन्याची चौकशी करण्याची तयारी दर्शविली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज