अ‍ॅपशहर

अंधूक प्रकाशामुळे भारताचा विजय हुकला

पावसामुळे जवळपास दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर आणि पहिल्या डावात घसरगुंडी उडाल्यानंतरही टीम इंडियाने कोलकाता कसोटीत जोरदार कमबॅक केले आणि शेवटच्या दिवशी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला.

Maharashtra Times 20 Nov 2017, 8:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sri lanka survive scare as 1st test ends in thrilling draw
अंधूक प्रकाशामुळे भारताचा विजय हुकला


पावसामुळे जवळपास दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर आणि पहिल्या डावात घसरगुंडी उडाल्यानंतरही टीम इंडियाने कोलकाता कसोटीत जोरदार कमबॅक केले आणि शेवटच्या दिवशी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. भारताने विजयासाठी दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची ७ बाद ७५ अशी दारूण अवस्था झाली होती मात्र अंधूक प्रकाश आडवा आला आणि भारताला हातातोंडाशी आलेल्या विजयाने हुलकावणी दिली.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आज खणखणीत शतक ठोकत शतकांचे 'अर्धशतक' साजरे केले. विराटच्या १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ८ बाद ३५२ धावांवर डाव घोषित केला आणि श्रीलंकेपुढे विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने धक्का दिला. भुवी आणि शमीने टिच्चून मारा केल्याने लंकेचे पहिले चार फलंदाज अवघ्या २२ धावांत माघारी परतले आणि भारताला विजय खुणावू लागला.

कर्णधार दिनेश चंडिमल आणि डिकवेला यांनी काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीलंकेची धावसंख्या ६९ असताना या दोघांचाही अडसर दूर करण्यात यश आले. त्यानंतर परेराच्या रूपाने लंकेला सातवा धक्का बसला. भारत विजयापासून अवघा तीन विकेट दूर होता. षटकांची गती वाढवून श्रीलंकेला झटपट गुंडाळायचा भारताचा बेत होता मात्र अंधूक प्रकाश आडवा आला.

घड्याळात ४ वाजून २६ मिनिटे झाली असताना मैदानावरील पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आणि पराभवाच्या छायेत असलेल्या श्रीलंका संघाने जणू सुटकेचा निश्वास टाकला.

भारत वि. श्रीलंका सामन्याचे संपूर्ण स्कोअरकार्ड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज