म. टा. प्रतिनिधी, मुंबई
आगामी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेनंतर होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी समान दर्जाचा चेंडू वापरण्याची सूचना मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) केली आहे. मात्र, त्याला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विरोध दर्शविला आहे. या सूचनेचा जर गंभीरपणे विचार केला गेला, तर ते निश्चितच दुर्दैवी असेल, असा शब्दांत गावसकरांनी टीका केली आहे.
एमसीसीच्या जागतिक क्रिकेट समितीने कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी काही प्रस्ताव ठेवले आहेत. गावसकर म्हणाले, 'जर चेंडूमध्ये एकसमानता आणायची असेल तर खेळपट्टीतही आणा, बॅटमध्येही आणा. मग क्रिकेट खेळण्याला काय अर्थ आहे? तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत खेळता म्हणूनच क्रिकेट खेळण्याची मजा आहे.' विविध देशांत कूकाबुरा, ड्युक आणि एसजीचे चेंडू वापरले जातात. त्यात एकसमानता आणण्याचा विचार एमसीसीने केला आहे. त्यावर गावसकरांनी नाराजी प्रकट केली आहे. गावसकर म्हणाले, 'ही एमसीसीची समिती म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, कोलकात्याचा नॅशनल क्रिकेट क्लब किंवा मद्रास क्रिकेट क्लबसारखी आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांचा सगळेजण गांभीर्याने विचार करतात.' सध्या एसजीचे चेंडू भारतात वापरले जातात तर ड्युक्सचे चेंडू इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये आणि कूकाबुराचे चेंडू ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत वापरले जातात.
गावसकर म्हणाले, 'परदेशात आणि मायदेशात कसोटी क्रिकेट खेळण्याची वेगळी मजा आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत खेळणे हेच क्रिकेटचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एखाद्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत क्रिकेट खेळतानाही वेगवेगळ्या परिस्थितीचा अनुभव येतो. शहराशहरात आणि देशादेशातील फरक तर सोडूनच द्या. एखाद्या गल्लीत तुम्ही सरळ चेंडू मारू शकत नाहीत. तिथे एखादा पोलिस उभा असतो, एखादा फेरीवाला येत असतो. दुसऱ्या गल्लीत नेमकी वेगळी परिस्थिती असते. क्रिकेटची मजा या वेगवेगळ्या वातावरणात खेळण्यातच आहे. एखादा खेळाडू त्याला माहीत नसलेल्या परिस्थितीत कसा खेळतो यावर त्याचे मोठेपण ठरत असते.' भारत वर्ल्ड कप जिंकेल का या प्रश्नाची खिल्ली उडवताना गावसकर म्हणाले की, मला हे उत्तर देण्यास नक्कीच आवडले असते; पण दुर्दैवाने मला विराटचा तळहात पाहाता आलेला नाही. पण मला आशा आहे की, भारत विजयी होईल.
आगामी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेनंतर होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी समान दर्जाचा चेंडू वापरण्याची सूचना मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) केली आहे. मात्र, त्याला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विरोध दर्शविला आहे. या सूचनेचा जर गंभीरपणे विचार केला गेला, तर ते निश्चितच दुर्दैवी असेल, असा शब्दांत गावसकरांनी टीका केली आहे.
एमसीसीच्या जागतिक क्रिकेट समितीने कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी काही प्रस्ताव ठेवले आहेत. गावसकर म्हणाले, 'जर चेंडूमध्ये एकसमानता आणायची असेल तर खेळपट्टीतही आणा, बॅटमध्येही आणा. मग क्रिकेट खेळण्याला काय अर्थ आहे? तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत खेळता म्हणूनच क्रिकेट खेळण्याची मजा आहे.' विविध देशांत कूकाबुरा, ड्युक आणि एसजीचे चेंडू वापरले जातात. त्यात एकसमानता आणण्याचा विचार एमसीसीने केला आहे. त्यावर गावसकरांनी नाराजी प्रकट केली आहे. गावसकर म्हणाले, 'ही एमसीसीची समिती म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, कोलकात्याचा नॅशनल क्रिकेट क्लब किंवा मद्रास क्रिकेट क्लबसारखी आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांचा सगळेजण गांभीर्याने विचार करतात.' सध्या एसजीचे चेंडू भारतात वापरले जातात तर ड्युक्सचे चेंडू इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये आणि कूकाबुराचे चेंडू ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत वापरले जातात.
गावसकर म्हणाले, 'परदेशात आणि मायदेशात कसोटी क्रिकेट खेळण्याची वेगळी मजा आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत खेळणे हेच क्रिकेटचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एखाद्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत क्रिकेट खेळतानाही वेगवेगळ्या परिस्थितीचा अनुभव येतो. शहराशहरात आणि देशादेशातील फरक तर सोडूनच द्या. एखाद्या गल्लीत तुम्ही सरळ चेंडू मारू शकत नाहीत. तिथे एखादा पोलिस उभा असतो, एखादा फेरीवाला येत असतो. दुसऱ्या गल्लीत नेमकी वेगळी परिस्थिती असते. क्रिकेटची मजा या वेगवेगळ्या वातावरणात खेळण्यातच आहे. एखादा खेळाडू त्याला माहीत नसलेल्या परिस्थितीत कसा खेळतो यावर त्याचे मोठेपण ठरत असते.' भारत वर्ल्ड कप जिंकेल का या प्रश्नाची खिल्ली उडवताना गावसकर म्हणाले की, मला हे उत्तर देण्यास नक्कीच आवडले असते; पण दुर्दैवाने मला विराटचा तळहात पाहाता आलेला नाही. पण मला आशा आहे की, भारत विजयी होईल.