जयपूर : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे (३७ चेंडूत ५१) सुपरनोव्हाजने शनिवारी पहिल्या वहिल्या 'वूमन्स टी-२० चॅलेंज' स्पर्धेचे जेतेपद पटकावले. महिलांची आयपीएल या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत शनिवारी पार पडलेल्या फायनलमध्ये सुपरनोव्हाजने मिताली राजच्या व्हेलोसिटीवर चार विकेटने मात केली. येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम फेरीत १२२ धावांचे आव्हान सुपरनोव्हाजने चार विकेट राखून अखेरच्या चेंडूवर पार केले.
सुपरनोव्हाजला जेतेपद
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे (३७ चेंडूत ५१) सुपरनोव्हाजने शनिवारी पहिल्या वहिल्या 'वूमन्स टी-२० चॅलेंज' स्पर्धेचे जेतेपद पटकावले...
MT 12 May 2019, 4:00 am