अ‍ॅपशहर

टी-२०तही सरस ठरू !

टी-२०तही सरस ठरू !सौरव गांगुलीकसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेत सर्वोत्तम ठरला...

Maharashtra Times 18 Feb 2018, 6:38 am
टी-२०तही सरस ठरू !
महाराष्ट्र टाइम्स.कॉम t 20 be sure to be gelatin
टी-२०तही सरस ठरू !


सौरव गांगुली

कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेत सर्वोत्तम ठरला. भारताने ही मालिका ५-१ अशी जिंकली आणि त्यात विराटचा खेळ पाहण्यायोग्यच झाला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील जो मूलभूत फरक होता तो विराटच्या रूपात स्पष्ट झाला. अखेरच्या सहाव्या आणि ज्या सामन्यावर मालिकेची भिस्त नव्हती अशा सामन्यातही त्याने जीव तोडून फलंदाजी केली. वनडे क्रिकेटमध्ये भारत हा सर्वोत्तम आहे, हे या निमित्ताने सिद्ध झाले. त्यामुळे आगामी टी-२० मालिकेतही भारताचा हा धडाका कायम राहील यात शंका नाही. मला तर खात्री आहे की, भारत या टी-२० मालिकेनंतर सर्वोच्च कामगिरीचे उदाहरण घालून देईल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कोणत्याही दोन संघातील फरक हा कमी होत असतो. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या भारतीय संघाशी दोन हात करताना आपला खेळ प्रचंड उंचवावा लागेल.

या वनडे मालिकेत डीव्हिलियर्सचा फॉर्म हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाची डोकेदुखी ठरली आहे. त्यात भारतीय गोलंदाजांनी त्याच्यावर सातत्याने दडपण ठेवले आहे. टी-२० सामन्यांत पहिली लढत ही वॉन्डरर्सवर होत आहे आणि इथे वनडे मालिकेत ओलसर चेंडूने भारताला जसे संत्रस्त केले होते, तसे ते यावेळी होणार नाही. भारतीय संघात सुरेश रैनाचे आगमन झाले आहे आणि आपले अस्तित्व दाखविण्याची संधी त्याला साधायची आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज