नवी दिल्ली:
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकपचा महासंग्राम होणार आहे. क्रिकेटच्या या रणमैदानात भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांची 'लढाई' अनुभवता येईल, अशी आशा बाळगून असलेल्या दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची आयसीसीनं घोर निराशा केली आहे. हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांत खेळणार आहेत. त्यामुळं साखळी फेरी पार केल्यानंतरच हे दोन्ही संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे. २०२०मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक मंगळवारी जाहीर झालं. भारत आणि पाकिस्तानसह आठ संघ वर्ल्डकपमधील सुपर १२ मध्ये खेळण्यास पात्र ठरले आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ दोन गटांत खेळणार आहेत. त्यामुळं या प्रतिस्पर्धी संघांची लढत बघण्यासाठी चाहत्यांना नॉकआऊट सामन्यांपर्यंत म्हणजेच सेमिफायनल किंवा फायनलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
डिसेंबर २०१८ रोजी जाहीर झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाकिस्तान पहिल्या आणि भारतीय संघ दुसऱ्या स्थानी होता. वर्ल्डकप स्पर्धेत या दोन्ही संघांना एकाच गटात खेळवलं जाणार नाही. त्यामुळं साखळी फेरीत हे दोन्ही संघ भिडणार नाहीत. विशेष म्हणजे, २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सामने खेळतील. पण ठिकाण आणि सामन्यांची वेळ वेगवेगळी असणार आहे. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान लढत होणार आहे. तर याच दिवशी पर्थमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकपचा महासंग्राम होणार आहे. क्रिकेटच्या या रणमैदानात भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांची 'लढाई' अनुभवता येईल, अशी आशा बाळगून असलेल्या दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची आयसीसीनं घोर निराशा केली आहे. हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांत खेळणार आहेत. त्यामुळं साखळी फेरी पार केल्यानंतरच हे दोन्ही संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०१८ रोजी जाहीर झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाकिस्तान पहिल्या आणि भारतीय संघ दुसऱ्या स्थानी होता. वर्ल्डकप स्पर्धेत या दोन्ही संघांना एकाच गटात खेळवलं जाणार नाही. त्यामुळं साखळी फेरीत हे दोन्ही संघ भिडणार नाहीत. विशेष म्हणजे, २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सामने खेळतील. पण ठिकाण आणि सामन्यांची वेळ वेगवेगळी असणार आहे. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान लढत होणार आहे. तर याच दिवशी पर्थमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.