अ‍ॅपशहर

अर्शदीप सिंगने रचला इतिहास, जगभरात कोणत्याही खेळाडूला करता आला नाही हा विश्वविक्रम

Arshdeep Singh : अर्शदीप सिंगने आजच्या सामन्यात इतिहास रचला. आशिया चषकामध्ये तो भारतासाठी व्हिलन ठरल्याचे म्हटले जात होते. पण यावेळी त्याने चाहत्यांना जोरदार धक्का दिला आणि या सामन्यात त्याने मोठा विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. आजच्या सामन्यात अर्शदीपने असं नेमकं केलं तरी काय आहे, जाणून घ्या नेमका कोणता विक्रम त्याने रचला आहे...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 23 Oct 2022, 2:59 pm
मेलबर्न : अर्शदीप सिंगने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. या सामन्यात अर्शदीपने असं काही करून दाखवलं जे आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणालाही आतापर्यंत करता आलेले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम T 20 WORLD CUP
सौजन्य-ट्विटर


अर्शदीपने आपल्या पहिल्याच चेंडूवर यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. बाबरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. अर्शदीप फक्त एवढ्यावरच थांबला नाही. कारण त्यानंतरच्या चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानलाही तंबूचा रस्ता दाखवला. अर्शदीपने यावेळी रिझवानला फक्त चार धावांवर असताना बाद केले. त्यामुळे यावेळी पाकिस्तानची २ बाद १५ अशी दयनीय अवस्था झाली होती. अर्शदीपने यावेळी सुरुवातीलाच दोन विकेट्स मिळवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. त्यामुळे पहिल्या १० षटकांमध्ये तर पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. अर्शदीपने यावेळी पाकिस्तानच्या दोृनंही सलामीवीरांना बाद केले. आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणत्याही एका गोलंदाजाला पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करता आलेले नाही. त्यामुळे हा विश्वविक्रम आता अर्शदीपच्या नावावर झाला आहे.

अर्शदीपने भारताला भन्नाट सुरुवात करून दिली. आयसीसी टी-२० क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघात आतापर्यंत ११ लढती झाल्या असून भारताने ८ तर पाकिस्तानने ३ मॅच जिंकल्या आहेत. टी-२० वर्ल्डकपचा विचार केल्यास ६ पैकी ५ लढती भारताने तर १ लढत पाकिस्तानने जिंकली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होतं, हे महत्वाचे असेल. हा सामना रोहितसाठीही महत्वाचा असेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाटी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी निराशजनक झाली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत दुसऱ्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपदासाठी सज्ज झालाय. दिवाळीच्या आधी रोहित नेहमी मोठा धमाका करण्यासाठी ओळखला जातो. जेव्हा जेव्हा भारतीय संघ दिवाळीच्या वेळी मॅच खेळत असतो तेव्हा तेव्हा रोहित शर्मा हिरो ठरलाय. त्यामुळे आता या सामन्यात रोहित कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख