अ‍ॅपशहर

भारताचा हा एक खेळाडू पाकिस्तानचा बँड वाजवेल, वीरेंद्र सेहवागने कोणत्या खेळाडूचं नाव घेतलं पाहा...

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा एकच खेळाडू असा आहे की, जो एकहाती संघाला सामना जिंकवून देऊ शकतो. सेहवागने यावेळी आपल्या अनुभवाच्या जोरावर भारतीय संघातील एका खेळाडूला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी पसंती दिली आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 24 Oct 2021, 5:30 pm
INDvsPAK : T20 World Cup 2021 : पुणे : भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात क्रिकेट मैदानातील युद्ध जगजाहीर आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही हे युद्ध मैदानाबाहेर सुरू आहे. आज भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ मधील पहिला सामना आज दुबईत खेळला जाणार आहे. हा सामना कोण जिंकणार याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सेहवागनेही त्याचं मत मांडलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs pak virender sehwag says hardik pandya is my first choice he could make match one sided
भारताचा हा एक खेळाडू पाकिस्तानचा बँड वाजवेल, वीरेंद्र सेहवागने कोणत्या खेळाडूचं नाव घेतलं पाहा...

सेहवाग म्हणाला की, जर हार्दिक चांगला खेळला, तर तो आपल्या फलंदाजीने सामन्याचा निकालही बदलू शकतो. पंड्याला गोलंदाजी करता येत नसली तरी सामना एकतर्फी फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि जर त्याने गोलंदाजी केली, तरी तो 'सोने पे सुहागा' होईल.

क्रिकबझवर एका संभाषणात सेहवागने कबूल केले की, 'जर हार्दिकने गोलंदाजी केली, तर सोने पे सुहागा होईल, पण २८ वर्षीय खेळाडूला जोपर्यंत तो फलंदाजीत चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तोपर्यंत त्याला संघात कायम ठेवावे. मी त्याला माझ्या संघात ठेवेन. कारण तो अशा प्रकारचा खेळाडू आहे की, तो चालला, तर सामना एकतर्फी करतो. त्याच्याकडे ही क्षमता आहे, आणि ती त्याने अनेकवेळा दाखवून दिली आहे. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी महत्वाचा असेल.'

सेहवाग म्हणाला, ''तुम्ही पाच गोलंदाज आणि हार्दिक पंड्यासह मैदानात उतरायला हवे. हार्दिकची फलंदाजी ही चिंतेची बाब ठरू शकते. जर तो चांगल्या फॉर्ममध्ये नसेल किंवा नेटमध्ये चांगली फलंदाजी करत नसेल, तर तुम्हाला इतर पर्याय पाहावे लागतील, अन्यथा तो माझी पहिली पसंती असेल.''

२०१९च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला होता. त्या सामन्यात हार्दिक पांड्याने १९ चेंडूत २६ धावा केल्या होत्या. भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३६ धावा केल्या होत्या. यासह त्याने आठ षटके टाकली. यासह मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिकच्या विकेट्सही घेतल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज