नवी दिल्ली : भारतीय संघ आता उपांत्य फेरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. पण आता भारताचा एकमेव सामना नामिबीयाबरोबर होणार आहे. या सामन्यात भारताने किती मोठ्या फरकाने विजय मिळवला तर त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता येऊ शकते, याची समीकरणही आता तयार झाले आहे.
भारताच्या उपांत्य फेरीचे काय आहे समीकरण, जाणून घ्या...भारतीय संघाने स्कॉटलंडवर विजय मिळवत रनरेट वाढवला असून गुणतालिकेतही तिसरे स्थान पटकावले आहे. आता गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावत भारताला उपांत्य फेरीत पोहोचायचे आहे, पण त्यासाठी त्यांना आता नामिबीयाचा सामना करावा लागणार आहे. भारत आणि नामिबीया यांच्यामध्ये आता ८ नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी सामना होणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवून तेव्हाच फायदा असेल जेव्हा अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करेल. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ७ नोव्हेंबरला सामना होणार असून तो भारतीय संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला तरच भारतीय संघासाठी उपांत्य फेरीचे दार उघडणार आहे. सध्याच्या घडीला अफगाणिस्तान हा गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांचा रनरेटही भारतापेक्षा कमी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ जेवढ्या फरकाने न्यूझीलंडला पराभूत करेल, तेवढ्याच फरकाने भारताला नामिबीयाला पराभूत करावे लागणार आहे. भारतासाठी जर हा योगायोग घडून आला तरच त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता येणार आहे. पण जर न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानवर विजय साकारला तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचता येणार नाही आणि त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा अफगाणिस्तानने न्यूझीलंडवरर विजय मिळवावा लागेल आणि त्यानंतर भारताने तेवढ्याच फरकाने नामिबीयाला पराभूत करावे लागेल. या दोन्ही गोष्टी घडल्यावरच भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे भारत आता उपांत्य फेरीत पोहोचणार की नाही, यासाठी पहिल्यांदा न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तान जिंकल्यास भारताचा मार्ग सुकर होऊ शकतो.
भारताच्या उपांत्य फेरीचे काय आहे समीकरण, जाणून घ्या...भारतीय संघाने स्कॉटलंडवर विजय मिळवत रनरेट वाढवला असून गुणतालिकेतही तिसरे स्थान पटकावले आहे. आता गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावत भारताला उपांत्य फेरीत पोहोचायचे आहे, पण त्यासाठी त्यांना आता नामिबीयाचा सामना करावा लागणार आहे. भारत आणि नामिबीया यांच्यामध्ये आता ८ नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी सामना होणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवून तेव्हाच फायदा असेल जेव्हा अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करेल. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ७ नोव्हेंबरला सामना होणार असून तो भारतीय संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला तरच भारतीय संघासाठी उपांत्य फेरीचे दार उघडणार आहे. सध्याच्या घडीला अफगाणिस्तान हा गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांचा रनरेटही भारतापेक्षा कमी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ जेवढ्या फरकाने न्यूझीलंडला पराभूत करेल, तेवढ्याच फरकाने भारताला नामिबीयाला पराभूत करावे लागणार आहे. भारतासाठी जर हा योगायोग घडून आला तरच त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता येणार आहे. पण जर न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानवर विजय साकारला तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचता येणार नाही आणि त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा अफगाणिस्तानने न्यूझीलंडवरर विजय मिळवावा लागेल आणि त्यानंतर भारताने तेवढ्याच फरकाने नामिबीयाला पराभूत करावे लागेल. या दोन्ही गोष्टी घडल्यावरच भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे भारत आता उपांत्य फेरीत पोहोचणार की नाही, यासाठी पहिल्यांदा न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तान जिंकल्यास भारताचा मार्ग सुकर होऊ शकतो.