अ‍ॅपशहर

भारत व इंग्लंड यांच्यातील सेमी फायनलचा सामना कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार, जाणून घ्या...

T 20 world cup semi final : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आता सेमी फायनलचा सामना होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. पण या दोन्ही संघांतील सामना आता किती तारखेला, कोणत्या मैदानात आणि किती वाजता सुरु होणार आहे, याते अपडेट्स आता समोर आले आहेत. भारत आणि इंग्लंडच्या सेमी फायनलची सर्व माहिती जाणून घ्या....

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 6 Nov 2022, 6:00 pm
मेलबर्न : भारताचा सामना आता सेमी फायनलमध्ये इंग्लंडबरोबर होणार आहे. कारण आता भारतापुढे इंग्लंडचे आणि पाकिस्तानसमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. पण भारताचा इंग्लंडबरोबरचा सामना आता कधी, कुठे आणि किती वाजता होणार आहे, याचे अपडेट्स आता समोर आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम T 20 world cup
सौजन्य-ट्विटर


झिम्बाब्वेचा विजय भारताच्या पथ्यावर पडला आहे. भारताने विजयासह अव्वल स्थान पटकावले, त्यामुळे आता त्यांचा सामना पहिल्या गटामधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाबरोबर होणार आहे. पहिल्या गटात पहिल्या स्थानावर न्यूझीलंड आहे, तर दुसरे स्थान इंग्लंडने पटकावले आहे. त्यामुळे आता भारताचा सेमी फायनलमध्ये सामना हा इंग्लंडबरोबर होणार आहे. टी-२० विश्वचशषकातील दुसरा सेमी फायनलचा सामना हा आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना आता १० नोव्हेंबरला गुरुवारी अॅडलेडच्या मैदानात होणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना हा बुधवारी ९ नोव्हेंबरला सिडनीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहेत आणि स्टार स्पोर्ट्सवर त्यांचे लाइव्ह प्रसारण पाहता येणार आहे.

भारताच्या विजयाने सर्व समीकरण बदलले आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानने जेव्हा विजय मिळवला होता तेव्हा त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. पण भारताने झिम्बाब्वेवर विजय साकारला आणि त्याने पाकिस्तानला मागे सारत आता गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. कारण पाकिस्तानचे विजयानंतर सहा गुण झाले होते. पण त्यानंतर भारताने विजय साकारला आणि त्यांचे आठ गुण झाले त्यांनी आता गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. जर भारत दुसऱ्या स्थानावर राहिला असता तर त्यांना न्यूझीलंडचा सामना करावा लागला असता. पण भारताने झिम्बाब्वेवर विजय साकारला आणि त्यांना आता इंग्लंडच्या संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे भारताला सेमी फायनलमध्ये जिंकण्याची संधी जास्त असल्याचे म्हटले जात आहे. कारण इंग्लंडपेक्षा न्यूझीलंडचा संघ सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात असल्याचे पाहायला मिळत आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख