अ‍ॅपशहर

भारताला पराभवाच्या दुःखात ऋषभ पंतचा त्यागाचा विसर, करियर धोक्यात असताना केली मोठी कामगिरी

Rishabh Pant: भारतीय संघाला टी-२० विश्वचषकात पराभवाला सामोरे जावे लागले आणि चॅम्पियन बनण्याचे त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा संपुष्टात आले आहे. या सामन्यात घडलेल्या एका घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. स्वतःच्या कारकिर्दीची चिंता सोडून ऋषभ पंतने केलेला त्याग सध्या जोर धरून आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2022, 12:38 pm
ॲडलेड: टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत आणि इंग्लंडमधील उपांत्य फेरीचा सामना ॲडलेडमधील ओव्हल मैदानावर खेळवला गेला. भारताने शर्थीचे प्रयत्न केले खरे पण त्या प्रयत्नांना यश काही आलं नाही. इंग्लंडच्या संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतावर दबाव कायम ठेवला आणि हा दबाव फलंदाजीच्या वेळेस अधिक जाणवला आणि शेवटपर्यंत कायम ठेवला. त्यामुळेच इंग्लंडच्या संघाने १० विकेट्सने भारताचा मानहानीकारक पराभव केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rishabh Pant


या सामन्यात भारताची पहिल्या डावात संथ सुरुवात झाली, मध्येच रोहितने धावा जमवल्या पण हळूहळू भारताच्या धावांना ब्रेक लागताना देखील दिसत होता. या सामन्यात विराट आणि हार्दिकच्या भागीदारीने भारताचा डाव पुन्हा एकदा सावरला. पण पंत क्रीझ आल्यावर त्याने हार्दिकसाठी जो त्याग केला, तो पाहून सर्वांनाच त्याची वाहवा करावीशी वाटेल.

वाचा: सानिया-शोएबचा घटस्फोट निश्चित! सानियाने सोडले दुबईमधील राहते घर...

या युवा यष्टिरक्षकाची कारकीर्द आधीच अडचणीत आहे आणि असे असतानाही पंतने इंग्लंडविरुद्ध हार्दिक पांड्यासाठी आपली विकेट गमावण्यास उशीर केला नाही. ऋषभ पंतने हार्दिक पांड्या आणि संघासाठी आपल्या विकेटचे बलिदान दिले. १९ व्या षटकात ही घटना घडली. ख्रिस जॉर्डनच्या षटकातील तिसरा चेंडू मारण्यात पंत अपयशी ठरला, त्यानंतर तो चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. दरम्यान, हार्दिकने स्ट्राइक घेण्यासाठी धाव घेतली, पण पंत तयार नव्हता. हार्दिक पंड्याने दबाव टाकल्यावर ऋषभ पंत धावला, पण त्याला उशीर झाला.

हेही वाचा: ड्रग्जमुळे संघाने काढून टाकलेला खेळाडू ठरला विजयाचा हिरो, ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर केला धमाका

हार्दिक त्या घडीला फॉर्ममधील फलंदाज होता, त्यामुळे ऋषभ पंतने कठीण परिस्थिती पाहून आपल्या विकेटचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि नॉन स्ट्रायकरच्या दिशेने त्याची विकेट गमावली. त्याला वाटले की हार्दिक चांगले शॉट्स खेळत आहे, म्हणून तो अंगठा दाखवत पॅव्हेलियनच्या दिशेने अवजड पावले घेऊन परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने पुढच्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकले.

हार्दिक पांड्याने ३३ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ६३ धावांची खेळी केली आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर भारताने १६८ धावांची मजल गाठली, पण गोलंदाजांना इंग्लंडविरुद्ध या धावा वाचवण्यात अपयश आले.

वाचा: दिग्गज खेळाडू निवृत्ती घेणार, टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार; सुनील गावस्करांनी थे

ऋषभ पंतला या स्पर्धेत जास्त संधी मिळालेल्या नाहीत. सुपर-१२ दरम्यान, पंतला केवळ एका सामन्यात अंतिम अकराचा भाग बनवण्यात आले, ज्यामध्ये तो ३ धावांवर बाद झाला. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऋषभ पंत ४ चेंडूत ६ धावा काढून बाद झाला. हार्दिक पांड्याने ६३ धावा केल्या. पंत बाद झाल्यानंतर हार्दिकने पुढच्या दोन चेंडूत १० धावा केल्या.

वाचा:सानियाच्याआधी शोएबची ती पोस्ट तुफान व्हायरल, 'आपण एकत्र नसलो तरी....

बटलर आणि हेल्सच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला. इंग्लंडच्या या विजयासह भारताचे टी-२० विश्वचषक २०२२ मधील आव्हान संपुष्टात आले आहे आणि इंग्लंडने यंदाच्या टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. रविवारी १३ नोव्हेंबरला इंग्लंडचा संघ पाकिस्तानशी मेलबर्न मैदानावर अंतिम सामना खेळेल.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख