अ‍ॅपशहर

एकच वादा सूर्या दादा... झिम्बाब्वेची धुलाई करत भारतासाठी उभारला धावांचा मोठा डोंगर

T 20 World Cup : भारतासाठी झिम्बाब्वेचा सामना हा सर्वात महत्वाचा होता. त्यामुळे ते या सामन्यात कशी फलंदाजी करतात, हे सर्वात महत्वाचे होते. लोकेश राहुलने अर्धशतक झळकावत संघाची चांगली सुरुवात केली. पण तो बाद झाला आणि भारताचा डाव अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवची धडाकेबाज फटकेबाजी पाहायला मिळाली.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 6 Nov 2022, 3:18 pm
मेलबर्न : सर्यकुमार यादव पुन्हा एकदा तळपल्याचे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. सूर्याने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फटकेबाजी करत २५ चेंडूंत नाबाद ६१ धावा साकारल्या आणि टी-२० क्रिकेटमधील आपल्या १००० धावाही पूर्ण केल्या. सूर्याच्या या धडाकेबाज फटकेबाजीमुळे भारताला या सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभारता आला. त्यापूर्वी लोकेश राहुलने दमदार अर्धशतक साकरले आणि भारताच्या मोठ्या धावसंख्येचा चांगला पाया रचला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम T 20 world cup
सौजन्य-ट्विटर


रोहित शर्मा पुन्हा एकदा या सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. रोहितला यावेळी १५ धावा करता आल्या आणि भारताला २७ धावांवर पहिला धक्का बसला. रोहित लवकर बाद झाला असला तरी त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली आणि भारताच्या डावाचा चांगला आकार दिला. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. कोहलीला यावेळी २६ धावा करता आल्या.

कोहली बाद झाला तरी राहुल मात्र खेळपट्टीवर कायम होता आणि त्यानंतर त्याने अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. राहुलले यावेळी दमदार फटकेबाजी केली. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र राहुलला जास्त धावा करता आल्या नाहीत. राहुलने यावेळी ३५ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ५१ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाला आणि रिषभ पंत फलंदाजीला आला. पंतला या सामन्यात संधी देण्यात आली होती, त्यामुळे तो या संधीचे सोने करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण पंतला यावेळी या संधीचे सोने करता आले नाही. पंत यावेळी फक्त तीन धावांवर बाद झाला.

पंत बाद झाला आणि त्यानंतर भारताचे काय होणार, ही चिंता चाहत्यांना होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. सूर्या यावेळी भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले आणि त्याने मैदानात सर्व ठिकाणी आपले फटके लगावले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख