अ‍ॅपशहर

एक क्षण ही मिस होणार नाही; एका क्लिकवर पाहा भारत-पाकिस्तान मॅचचा संपूर्ण थरार

India vs Pakistan Highlights Streaming: टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. मेलबर्नमध्ये रविवारी (२३ ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या या सामन्यातील थरार तुम्ही अनुभवाला नसेल तर तुमच्यासाठी आजच्या दिवाळीच्या दिवशी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2022, 4:28 pm
मुंबई: दीपावलीच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी (२३ ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांनी भारत आणि पाकिस्तान सामन्याचा आनंद लुटला. टी-२० विश्वचषक २०२२ अंतर्गत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ४ विकेट्सने पराभव केला. या पराभवासह टीम इंडियाने भारतवासियांना दिवाळीचं एक खास गिफ्ट देखील दिलं. अर्शदीप, हार्दिक, शमीच्या चेंडूने पाकिस्तानला गारद केले तर विराटच्या खेळीने सगळ्यांचीच बोलती बंद केली. आता चाहत्यांना दिवाळीच्या दिवशी पुन्हा या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India vs Pakistan


हा सामना खूपच रोमांचक होता, ज्याचा हिरो होता विराट कोहली. त्याने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ६ चौकार मारले. कोहलीचा स्ट्राइक रेट १५४.७२ आहे. या खेळीसाठी कोहलीला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.

वाचा: अश्विनचं डोकं म्हणजे सुपरफास्ट! कोहलीही झाला फॅन, शेवटच्या चेंडूपूर्वी काय घडले पाहा

भारतातील विश्वचषक सामन्यांची प्रसारक वाहिनी स्टार स्पोर्ट्सने आपल्या चाहत्यांना दिवाळीची एक भेट दिली आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनी आज दिवाळी दिवशी रात्री ८ वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पुन्हा त्याच रोमांचक ढंगात पुन्हा दाखवणार आहे. हा हायलाइट सामना थेट लाईव्ह सामन्याप्रमाणेच रोमांचक पद्धतीने दाखवला जाईल. या सामन्यातील प्रत्येक चेंडूचा थरार चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. यासोबतच संपूर्ण मॅच रिप्ले हॉटस्टारवर अपलोड करण्यात आला आहे.

कोहली-हार्दिकच्या भागीदारीने विजयाची दिशा दाखवली

आज दाखवल्या जाणाऱ्या हायलाईटमध्ये चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार विराट कोहलीची ती सर्वोत्तम खेळी पुन्हा एकदा त्याच शैलीत पाहायला मिळणार आहे, जी त्यांनी थेट लाईव्ह सामन्यादरम्यान पाहिली होती. टीम इंडियाने ३१ धावांत ४ विकेट्स कशा गमावल्या आणि सामना हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर कोहलीने हार्दिक पांड्यासोबत मिळून ७८ चेंडूत ११३ धावांची भागीदारी करून सामन्याचे रूप पालटले. हे संपूर्ण साहस पुन्हा पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: Video Of the Day: कोण म्हणतं विराट-रोहितमध्ये भांडण आहे? कॅप्टन आला आणि थेट

टीम इंडियाची विजयी घोडदौड

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सवर १५९ धावा केल्या होत्या. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी गोलंदाजीमध्ये खूप प्रभावी ठरले. अर्शदीप आणि पंड्याने प्रत्येकी तीन बळी घेतले. पाकिस्तानी संघासाठी शान मसूदने नाबाद ५२ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याचवेळी इफ्तिखार अहमदने ४३ चेंडूत ५१ धावा केल्या.

वाचा: मॅच झाल्यावर विराट झाला भावनिक, डोळ्यात अश्रू आणि उच्चारले ते शब्द

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सातव्या षटकात संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये असताना ३१ धावा झाल्या. केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी चार, तर सूर्यकुमार यादव १५ आणि अक्षर पटेल दोन धावा करून बाद झाले. त्यानंतर कोहलीने हार्दिक पांड्यासोबत शतकी भागीदारी करून टीम इंडियाचे सामन्यात पुनरागमन केले. अशाप्रकारे टीम इंडियाने हा सामना ४ विकेटने जिंकला.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख