अ‍ॅपशहर

IND Vs BAN: अर्शदीपच्या दिशेने कॅच गेला अन् रोहितला सारे देव आठवले... पाहा VIDEO

T-20 World Cup 2022: भारतीय संघाने बुधवारी बांगलादेशचा पराभव करत टी-२० विश्वचषकात तिसरा विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धच्या या विजयासाठी भारताला मोठा घाम गाळावा लागला. एकेकाळी बांगलादेशच्या सलामीच्या जोडीला भारत रोखू शकणार नाही असे वाटत होते.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2022, 10:02 pm
मुंबई: भारतीय संघाने बुधवारी बांगलादेशचा पराभव करत टी-२० विश्वचषकात तिसरा विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धच्या या विजयासाठी भारताला मोठा घाम गाळावा लागला. एकेकाळी बांगलादेशच्या सलामीच्या जोडीला भारत रोखू शकणार नाही असे वाटत होते, पण सामन्यात पावसाने हजेरी लावताच सारे काही बदलले. हा सामना जिंकण्यात भारताच्या फलंदाजी आणि गोलंदाजीइतकीच भूमिका क्षेत्ररक्षणाची होती. युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात एक अप्रतिम झेल घेतला, ज्याबद्दल त्याने युझवेंद्र चहलशीही चर्चा केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma And Arshdeep Singh
अर्शदीपच्या दिशेने कॅच गेला अन् रोहितला देव आठवले... पाहा VIDEO


अर्शदीप सिंगने बाराव्या षटकात यासिर अलीचा अप्रतिम झेल घेतला. सामना संपल्यानंतर चहलने अर्शदीपला त्या महत्त्वाच्या झेलबद्दल विचारले. अर्शदीपने सांगितले की, तो जिथे फिल्डिंग करत होता तिथे तो नेहमीच चांगला करतो आणि या झेलचं श्रेय त्याने रोहित शर्माला दिले आहे, ज्याला या कॅचवेळी सगळे देव आठवले.


हेही वाचा -T-20 World Cup 2022: वर्ल्डकप आपलाच? रोहित शर्माला बुमराहसारखा घातक खेळाडू सापडला...

रोहितला देव आठवले

चहलने अर्शदीपला सांगितले की, जेव्हा बॉल हा हवेत होता तेव्हा कर्णधार रोहित हा राम नामाचा जप करत होता. तो हात जोडून होता, त्याला आशा होती की अर्शदीप तो कॅच सोडणार नाही. अर्शदीप सिंगनेही हार्दिक पांड्याच्या षटकात एक शानदार कॅच घेतला, ज्यामुळे भारताला यासिर अलीची विकेट मिळाली. चहलने अर्शदीपला विचारले की चेंडू हवेत असताना तो काय विचार करत होता?

चहलने अर्शदीपला गमतीने विचारलं की कॅच घेताना तो काय विचार करत होता. एका हाताने कॅच घेऊ की एका बोटाने कॅच घेऊ. यावर अर्शदीप म्हणाला, 'मी एका हाताने किंवा एका बोटाने कॅच घेण्याचा विचार करू शकत नाही, कारण ते फक्त तुम्हीच करू शकता. पण मला माहीत होते की मी पॉईंटचा चांगला फिल्डर आहे आणि मी हे रोहितला सांगितले होते'.

हेही वाचा -T-20 World Cup: पाकिस्तान सेमीफायनलच्या लायकीचाच नाही, शोएब अख्तरनेच पाक संघाची लाज काढली...

राहुल त्याच्या त्या थ्रोबद्दल काय म्हणाला?

याशिवाय, युझवेंद्र चहलने केएल राहुलला त्या रनआउटबद्दल विचारलं ज्यानंतर संपूर्ण सामनाच बदलून गेला. पावसानंतर सामना सुरु झाला आणि दुसऱ्याच चेंडूवर राहुलने ६० धावांची तुफानी इनिंग खेळणाऱ्या लिटन दासला बाद केले. राहुल म्हणाला, 'ब्रेकनंतर दुसऱ्या चेंडूवर तो रनआउट झाली. त्यावेळी आमचा उत्साह खूप वाढला होता. आम्हाला फक्त जिंकायचे होते. सामना महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहीत होते. मी खूप नशीबवान होतो की माझ्या थ्रोने लक्ष्य गाठले आणि त्यानंतर आम्ही सामन्यात पुनरागमन करू याचा आत्मविश्वास वाढला'.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज