अ‍ॅपशहर

गावस्करांनी टीम इंडियाच्या थेट वर्मावर बोट ठेवलं; एका शब्दात सांगितलं चुकलं तरी काय

Team India: भारतीय क्रिकेट संघाच्या वर्ल्डकपमधील कामगिरीवर माजी खेळाडूंकडून जोरदार टीका होत आहे. अशात सुनील गावस्कर यांनी संघातील एक मोठी चूक दाखवून दिली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2022, 4:18 pm
नवी दिल्ली: टी-२० वर्ल्डकप २०२२च्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर भारतीय संघातील कमतरतेवर जोरदार चर्चा सुरू झ झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारताचा १० विकेटनी पराभव झाला. भारतीय संघाच्या या कामगिरीवर माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sunil Gavaskar


टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये विजय मिळवता आला नाही. सुनील गावस्कर यांनी संघातील कमकूवत बाजू समोर आणल्या आहेत. याआधी संघातील खेळाडूंबद्दल बोलणाऱ्या गावस्कर यांनी सपोर्ट स्टाफवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

वाचा- वर्ल्डकप फायनल खेळणाऱ्या पाकिस्तानचा गेम; ICCच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची...

जेव्हा तुमच्याकडे ऑल टाइम फेव्हरेट फलंदाज राहुल द्रविड असताना तुम्हाला फलंदाजीच्या प्रशिक्षकाची गरज नाही. जेव्हा राहुल द्रविड काही तरी सांगतात तेव्हा विक्रम राठोड अजून काही तरी सांगतात, अशा वेळी फलंदाज गोंधळतो. तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की अधिक सपोर्ट स्टाफची गरज नाही आणि त्यांना संघासोबत पाठवण्याची गरज नाही. फक्त त्यांनाच पाठवा ज्यांची गरज आहे.

वाचा- जो भारताशी नडला त्याला कधीच...; टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये पाकिस्तानचा...

सुनील गावस्करांनी भारताच्या सध्याच्या सपोर्ट स्टाफची तुलना १९८३च्या संघाशी केली. तेव्हा आमच्यासोबत फक्त एक मॅनेजर होता. १९८५ साली देखील हीच परिस्थिती होती. २०११ साली जेव्हा भारताने वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा संघासोबत अधिक सपोर्ट स्टाफ नव्हता.

वाचा- FIFA World Cup 2022: ग्रुप-अ, नेदरलँड्सचे गटात एकतर्फी वर्चस्व अपेक्षित

या गोष्टीमुळे मला धक्काच बसला की संघातील सदस्यांपेक्षा सपोर्ट स्टाफची संख्या अधिक आहे. यामुळे खेळाडू अधिक गोंधळून जातात, त्यांना कळत नाही की नेमक कोणाचे ऐकायचे आणि कोणाचे नाही, असे गावस्कर म्हणाले.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख