अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाची सुरूवात निराशजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघाकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यता इतर संघांच्या निकालावर अवलंबून आहेत. भारताने काल अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवला असला तरी त्याआधी पाकिस्तानने १० विकेटनी तर न्यूझीलंडने ८ विकेटनी पराभव केला होता.
वाचा-हिटमॅन रोहितचा नाद करायचा नाय; वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा विक्रम केला
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने संघातील बदलावरून मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्याच बरोबर संघातील हा बदल सल्लागार महेंद्र सिंह धोनीचा असू शकणार नाही असे देखील गंभीर म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघात बदल केला होता. यामुळे भारताला मोठा फटका बसला. न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशन तर भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा समावेश काला होता. इतक नव्हे तर रोहित शर्माला सलामीला न पाठवता इशानला पाठवण्यात आले होते. जो चुकीचा ठरला.
वाचा- Rohit Sharma Six: हिटमॅन रोहितचा तडाखा; विराट कोहलीला जागेवरून उठवले, Video
गंभीरने टाईम्स ऑफ इंडियामध्ये लिहलेल्या लेखात विराट कोहलीवर गंभीर आरोप केले आहेत. विराटने त्याच्या रणनितीने मला प्रभावीत केले नाही. विशेषत: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मी फार निराश झालो. मी धोनी सोबत मोठ्या काळ सोबत घालवला आहे. त्यामुळे ही गोष्ट नक्की सांगू शकतो की तो संघात लगेच कधी बदल करत नाही. मी धोनी सोबत मोठ्या काळ खेळलो आहे. तो कधीच संघात तातडीने बदल करत नाही. एक मॅच झाल्यानंतर तर तो कधीच बदल करत नाही. मला तर वाटते की कोचिंग स्टाफमध्ये देखील कोणी विराट कोहलीविरुद्ध बोलत नाही किंवा त्याच्या निर्णयांना आव्हान देत नाही.
वाचा- भारताकडून मिळालेल्या पराभवाची भरपाई न्यूझीलंडविरुद्ध करणार; राशिद खानने केलं मोठं वक्तव्य
वाचा-हिटमॅन रोहितचा नाद करायचा नाय; वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा विक्रम केला
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने संघातील बदलावरून मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्याच बरोबर संघातील हा बदल सल्लागार महेंद्र सिंह धोनीचा असू शकणार नाही असे देखील गंभीर म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघात बदल केला होता. यामुळे भारताला मोठा फटका बसला. न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशन तर भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा समावेश काला होता. इतक नव्हे तर रोहित शर्माला सलामीला न पाठवता इशानला पाठवण्यात आले होते. जो चुकीचा ठरला.
वाचा- Rohit Sharma Six: हिटमॅन रोहितचा तडाखा; विराट कोहलीला जागेवरून उठवले, Video
गंभीरने टाईम्स ऑफ इंडियामध्ये लिहलेल्या लेखात विराट कोहलीवर गंभीर आरोप केले आहेत. विराटने त्याच्या रणनितीने मला प्रभावीत केले नाही. विशेषत: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मी फार निराश झालो. मी धोनी सोबत मोठ्या काळ सोबत घालवला आहे. त्यामुळे ही गोष्ट नक्की सांगू शकतो की तो संघात लगेच कधी बदल करत नाही. मी धोनी सोबत मोठ्या काळ खेळलो आहे. तो कधीच संघात तातडीने बदल करत नाही. एक मॅच झाल्यानंतर तर तो कधीच बदल करत नाही. मला तर वाटते की कोचिंग स्टाफमध्ये देखील कोणी विराट कोहलीविरुद्ध बोलत नाही किंवा त्याच्या निर्णयांना आव्हान देत नाही.
वाचा- भारताकडून मिळालेल्या पराभवाची भरपाई न्यूझीलंडविरुद्ध करणार; राशिद खानने केलं मोठं वक्तव्य